शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

मैं अकेलाही चला था...लोग मिलते गये और कारवाँ बनता गया

By admin | Updated: January 6, 2017 00:29 IST

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.

जालना : ‘मै अकेला ही चला था जनीबे मंजील- मगर लोग मिलते गये और कारवॉं बनता गया’ या प्रमाणे जालन्यातील मुशायरा व हिंदी व मराठी कवितांची परंपरा रौप्य महोत्सवात पोहचली.जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी येथील बज्म शमा-ए-अदब या संस्थेकडून गत २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मुशायरे व कवी संमेलनाचे आयोजन करून जनजागृती करण्याचे काम होत आहे. येथील सेवानिवृत्त अभियंता एम.एच. खान दुर्राणी हे जालना शहरातील उर्दू, हिंदी, मराठीचे नामांकित मान्यवर कवी, शायर यांच्या सहकार्याने जातीय सलोखा, प्रेम, आदर, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता अखंडता व भारतीय भाषांना उत्तजेन तसेच प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवितात. मुशायरा व हिंदी कवितांची जालनेकरांना मेजवाणी मिळावी म्हणून १० जानेवारी १९९२ रोजी बज्म शमा-ए-अदम, हिंदू मुस्लिम कौमी एकता राष्ट्रीय अखंडता- सदभावना सेवाभावी संस्थेची स्थापना केली. त्यानंतर सुरू झाले दर्जेदार व श्रवणीय अशा मुशायरा व कवितांचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना जालनेकरांनी डोक्यावर घेतले. २५ वर्षांत तब्बल ३०० मुशायरे झाल्याचे दुर्राणी यांनी सांगितले. यात विविध जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभागी होऊन आपले कविता, मुशायरे सादर करतात. त्रैभाषिक मुशायरे, कवी संमेलने, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे, दीपावली, ईद, ख्रिसमसनिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात येते. मुशायरा व कवी संमेलनाची आठवण सांगताना दुर्राणी म्हणाले, ‘मै अकेला ही चलाथा जनीले मंजील- मगर लोग मिलते गये और काफिला बनता गया’ या प्रमाणे शेकडो मुशायरा व कविता सादर करण्यासाठी माझ्यासोबत जोडल्या गेले. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदावी म्हणून दुर्राणी यांनी ईद व त्यौहार की खुशीयाँ आओ मनाए हम मिलकर, कौमी एक जहेती और इन्सानियत की शान बढाये हम मिलकर, भारत देश नाम हुआ उँचा सारे देश मे जीस से हफिज, प्रेम अहिंसा की हरसू वो शमा जलाये हम मिलकर यासारख्या मुशायरातून जातीय सलोखा जपला.