शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:47 IST

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो.

हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात सुरू होता. तेव्हा आशाताई वाघमारे यांच्या नेतृत्वात निजाम राजवटीच्या विरोधात खारीचा वाटा उचलता आला. देशभक्तीची गाणी म्हणून घोषणा देणे, कार्यकर्त्यांना निरोप पोहोचविणे, पत्रके वाटणे ही कामे केली. तेव्हा यातून आलेल्या आत्मविश्वासाने स्वातंत्र्यानंतरही अनेक निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होता आले. 

१९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे या वैजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढवत होत्या. औरंगाबाद शहरात माणिकचंद पहाडे उभे होते. तेव्हा हैदराबादला विधानसभा होती. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाच-सहा मुली फिरत होतो. लोक मुलींना प्रचारात पाहून नाव ठेवायचे. मुलींनी घराबाहेर पडणे हेच मान्य नसलेला काळ होता. आम्हाला अक्षरश: वाळीत टाकलेले होते. चांगल्या भावनेने कोणी आमच्याकडे कधी पाहिलेच नाही. तेव्हा मुलीही जास्त नव्हत्या; पण आम्हाला मात्र त्रास होत होता.

आशाताई यांच्यामुळे आम्ही सहभाग घेत होतो. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये प्रचाराच्या सभा होत. त्या सभांना महिला कधी हजरच राहत नसत. माणसेही खूप कमी प्रमाणात येत. कोणालाही त्या निवडणुकांविषयी खूप काही आस्था नव्हती. मतदानाचा हक्क बजवावा, असेही कोणाला वाटत नसे. रॉकेलवरच्या ‘पेट्रोमॅक्स’च्या उजेडात सायंकाळी सभा घेत. कमल भोरे, प्रमिला पारनेरकर या माझ्या सहकारी होत्या. पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे निवडून आल्याचे मला आठवते. अधिवेशन काळात त्या हैदराबादला जात. त्यांचेच मार्गदर्शन आम्हाला मिळे.

तेव्हाही मतदार उत्साहाने मतदान करण्यासाठी जात नव्हते. आजही परिस्थिती बदललेली नाही. फरक एवढाच आहे की, तेव्हा मतदानासाठी नागरिकांना घेऊन जावे लागे. आज मतदानासाठी घेऊन जात असतानाच पैसेही द्यावे लागतात. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय दिवे लावणार? असाही प्रश्न उपस्थित होत असे. उमेदवार गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देऊन मतदानाला घेऊन जात होते. ही परिस्थिती स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही बदललेली नाही, याचे दु:ख होते.

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो. राजकारण कोणत्या थराला पोहोचले आहे. विकास नावाचा प्रकार कोणीच उच्चारत नाही. भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकीसह आणीबाणीपर्यंत पैसे वाटले जात नव्हते. उमेदवार किमान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर महिलांचा  असणारा सहभाग आणि आताचा सहभाग यात कमालीचा फरक पडला आहे. तेव्हा मुली शिक्षणच घेत नव्हत्या. त्यांची लवकर लग्ने केली जात होती. आता तशी परिस्थिती उरली नाही. महिलांचाही विकास मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक महिला प्रचारात, निवडणुकीत हिरीरीने भाग घेतात. हा बदल आनंददायी आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण