शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:47 IST

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो.

हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात सुरू होता. तेव्हा आशाताई वाघमारे यांच्या नेतृत्वात निजाम राजवटीच्या विरोधात खारीचा वाटा उचलता आला. देशभक्तीची गाणी म्हणून घोषणा देणे, कार्यकर्त्यांना निरोप पोहोचविणे, पत्रके वाटणे ही कामे केली. तेव्हा यातून आलेल्या आत्मविश्वासाने स्वातंत्र्यानंतरही अनेक निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होता आले. 

१९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे या वैजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढवत होत्या. औरंगाबाद शहरात माणिकचंद पहाडे उभे होते. तेव्हा हैदराबादला विधानसभा होती. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाच-सहा मुली फिरत होतो. लोक मुलींना प्रचारात पाहून नाव ठेवायचे. मुलींनी घराबाहेर पडणे हेच मान्य नसलेला काळ होता. आम्हाला अक्षरश: वाळीत टाकलेले होते. चांगल्या भावनेने कोणी आमच्याकडे कधी पाहिलेच नाही. तेव्हा मुलीही जास्त नव्हत्या; पण आम्हाला मात्र त्रास होत होता.

आशाताई यांच्यामुळे आम्ही सहभाग घेत होतो. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये प्रचाराच्या सभा होत. त्या सभांना महिला कधी हजरच राहत नसत. माणसेही खूप कमी प्रमाणात येत. कोणालाही त्या निवडणुकांविषयी खूप काही आस्था नव्हती. मतदानाचा हक्क बजवावा, असेही कोणाला वाटत नसे. रॉकेलवरच्या ‘पेट्रोमॅक्स’च्या उजेडात सायंकाळी सभा घेत. कमल भोरे, प्रमिला पारनेरकर या माझ्या सहकारी होत्या. पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे निवडून आल्याचे मला आठवते. अधिवेशन काळात त्या हैदराबादला जात. त्यांचेच मार्गदर्शन आम्हाला मिळे.

तेव्हाही मतदार उत्साहाने मतदान करण्यासाठी जात नव्हते. आजही परिस्थिती बदललेली नाही. फरक एवढाच आहे की, तेव्हा मतदानासाठी नागरिकांना घेऊन जावे लागे. आज मतदानासाठी घेऊन जात असतानाच पैसेही द्यावे लागतात. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय दिवे लावणार? असाही प्रश्न उपस्थित होत असे. उमेदवार गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देऊन मतदानाला घेऊन जात होते. ही परिस्थिती स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही बदललेली नाही, याचे दु:ख होते.

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो. राजकारण कोणत्या थराला पोहोचले आहे. विकास नावाचा प्रकार कोणीच उच्चारत नाही. भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकीसह आणीबाणीपर्यंत पैसे वाटले जात नव्हते. उमेदवार किमान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर महिलांचा  असणारा सहभाग आणि आताचा सहभाग यात कमालीचा फरक पडला आहे. तेव्हा मुली शिक्षणच घेत नव्हत्या. त्यांची लवकर लग्ने केली जात होती. आता तशी परिस्थिती उरली नाही. महिलांचाही विकास मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक महिला प्रचारात, निवडणुकीत हिरीरीने भाग घेतात. हा बदल आनंददायी आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण