शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मी पाहिलेली निवडणूक....आशाताई वाघमारेंच्या प्रचारात सहभागी झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:47 IST

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो.

हैदराबाद मुक्तिसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात सुरू होता. तेव्हा आशाताई वाघमारे यांच्या नेतृत्वात निजाम राजवटीच्या विरोधात खारीचा वाटा उचलता आला. देशभक्तीची गाणी म्हणून घोषणा देणे, कार्यकर्त्यांना निरोप पोहोचविणे, पत्रके वाटणे ही कामे केली. तेव्हा यातून आलेल्या आत्मविश्वासाने स्वातंत्र्यानंतरही अनेक निवडणुकांच्या प्रचारात सहभागी होता आले. 

१९५२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे या वैजापूर विधानसभेसाठी निवडणूक लढवत होत्या. औरंगाबाद शहरात माणिकचंद पहाडे उभे होते. तेव्हा हैदराबादला विधानसभा होती. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही पाच-सहा मुली फिरत होतो. लोक मुलींना प्रचारात पाहून नाव ठेवायचे. मुलींनी घराबाहेर पडणे हेच मान्य नसलेला काळ होता. आम्हाला अक्षरश: वाळीत टाकलेले होते. चांगल्या भावनेने कोणी आमच्याकडे कधी पाहिलेच नाही. तेव्हा मुलीही जास्त नव्हत्या; पण आम्हाला मात्र त्रास होत होता.

आशाताई यांच्यामुळे आम्ही सहभाग घेत होतो. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये प्रचाराच्या सभा होत. त्या सभांना महिला कधी हजरच राहत नसत. माणसेही खूप कमी प्रमाणात येत. कोणालाही त्या निवडणुकांविषयी खूप काही आस्था नव्हती. मतदानाचा हक्क बजवावा, असेही कोणाला वाटत नसे. रॉकेलवरच्या ‘पेट्रोमॅक्स’च्या उजेडात सायंकाळी सभा घेत. कमल भोरे, प्रमिला पारनेरकर या माझ्या सहकारी होत्या. पहिल्या निवडणुकीत आशाताई वाघमारे निवडून आल्याचे मला आठवते. अधिवेशन काळात त्या हैदराबादला जात. त्यांचेच मार्गदर्शन आम्हाला मिळे.

तेव्हाही मतदार उत्साहाने मतदान करण्यासाठी जात नव्हते. आजही परिस्थिती बदललेली नाही. फरक एवढाच आहे की, तेव्हा मतदानासाठी नागरिकांना घेऊन जावे लागे. आज मतदानासाठी घेऊन जात असतानाच पैसेही द्यावे लागतात. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी काय दिवे लावणार? असाही प्रश्न उपस्थित होत असे. उमेदवार गरीब, झोपडपट्टीतील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देऊन मतदानाला घेऊन जात होते. ही परिस्थिती स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही बदललेली नाही, याचे दु:ख होते.

आजच्या राजकारणाविषयी वाचून, ऐकून संताप येतो. राजकारण कोणत्या थराला पोहोचले आहे. विकास नावाचा प्रकार कोणीच उच्चारत नाही. भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकीसह आणीबाणीपर्यंत पैसे वाटले जात नव्हते. उमेदवार किमान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. मात्र स्वातंत्र्यानंतर महिलांचा  असणारा सहभाग आणि आताचा सहभाग यात कमालीचा फरक पडला आहे. तेव्हा मुली शिक्षणच घेत नव्हत्या. त्यांची लवकर लग्ने केली जात होती. आता तशी परिस्थिती उरली नाही. महिलांचाही विकास मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक महिला प्रचारात, निवडणुकीत हिरीरीने भाग घेतात. हा बदल आनंददायी आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण