शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मी महामार्गास विरोध करायला आलेलो नाही

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.लवासा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, महामार्ग क्रमांक ९ हे आपले सरकार असताना झाले, त्यावेळी भूसंपादन करावे लागलेच. मग मराठवाड्यातील या महामार्गाला आपला विरोध हा राजकीय आहे की शेतकऱ्यांसाठी. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, राजकीय विरोध नाही. मी विरोधासाठी आलेलो नाही. सर्व शेतकरी मला भेटले होते, त्यांचे म्हणणे मला ऐकून घ्यायचे आहे. मोबदला व्यवस्थित मिळत नाही का? त्याबाबत वेगळा विचार होणे गरजेचे आहे काय. यावर विचार होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांची जमीन घेतल्यानंतर त्याला मोबदला काय देणार याबाबत आमच्या सरकारच्या काळात समिती नेमून विचार झाला. एका एकराच्या किमतीचा विचार करून चालणार नाही. उर्वरित शेतीबाबतदेखील आम्ही विचार केला होता. आमच्या सरकारच्या काळात बाजारभावापेक्षा चौपट कॉम्पेन्सेशन दिले गेले होते. विभागाचा विकास रोखण्याशी काहीही संबंध नाही. विकास झालाच पाहिजे, तो हवेत होत नसतो. त्यासाठी जमीन हवी असते. परंतु बहुसंख्य लोकांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असेली जमीन काढून घेतली तर तो उद्ध्वस्त होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन गेली तर त्याची पुढची पिढीदेखील बरबाद होते. शेतीमधून महामार्ग जाणार असेल तर उर्वरित शेती करणे किती अवघड होणार आहे. मराठवाडा म्हणून विरोध करायची अशी भूमिका नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.सतीश चव्हाण, अभिजित देशमुख यांची उपस्थिती होती. शेतकरी म्हणतील ते करू ...यासंबंधी १६ ते १७ तालुक्यांतील शेतकरी पक्ष कार्यालयात भेटले. त्यांनी वेगवेगळ्या व्यथा मांडल्या. त्यामुळे ठरविले की शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शासनाशी बोलू. राज्य शासन दुरुस्ती करणार असेल तर समन्वयाची भूमिका ठेऊ. जर शासनाने समन्वयाबाबत विचार केला नाही आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना विचारू की बाबांनो आता पुढे काय करायचे आहे. शेतकरी म्हणतील ते आम्ही करू.