शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मी महामार्गास विरोध करायला आलेलो नाही

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मी आलेलो नाही. शेतकऱ्यांचे त्या महामार्गाच्या बाबतीत काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्यासाठी मी परिषदेसाठी हजर राहणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.लवासा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, महामार्ग क्रमांक ९ हे आपले सरकार असताना झाले, त्यावेळी भूसंपादन करावे लागलेच. मग मराठवाड्यातील या महामार्गाला आपला विरोध हा राजकीय आहे की शेतकऱ्यांसाठी. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, राजकीय विरोध नाही. मी विरोधासाठी आलेलो नाही. सर्व शेतकरी मला भेटले होते, त्यांचे म्हणणे मला ऐकून घ्यायचे आहे. मोबदला व्यवस्थित मिळत नाही का? त्याबाबत वेगळा विचार होणे गरजेचे आहे काय. यावर विचार होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांची जमीन घेतल्यानंतर त्याला मोबदला काय देणार याबाबत आमच्या सरकारच्या काळात समिती नेमून विचार झाला. एका एकराच्या किमतीचा विचार करून चालणार नाही. उर्वरित शेतीबाबतदेखील आम्ही विचार केला होता. आमच्या सरकारच्या काळात बाजारभावापेक्षा चौपट कॉम्पेन्सेशन दिले गेले होते. विभागाचा विकास रोखण्याशी काहीही संबंध नाही. विकास झालाच पाहिजे, तो हवेत होत नसतो. त्यासाठी जमीन हवी असते. परंतु बहुसंख्य लोकांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असेली जमीन काढून घेतली तर तो उद्ध्वस्त होऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन गेली तर त्याची पुढची पिढीदेखील बरबाद होते. शेतीमधून महामार्ग जाणार असेल तर उर्वरित शेती करणे किती अवघड होणार आहे. मराठवाडा म्हणून विरोध करायची अशी भूमिका नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.सतीश चव्हाण, अभिजित देशमुख यांची उपस्थिती होती. शेतकरी म्हणतील ते करू ...यासंबंधी १६ ते १७ तालुक्यांतील शेतकरी पक्ष कार्यालयात भेटले. त्यांनी वेगवेगळ्या व्यथा मांडल्या. त्यामुळे ठरविले की शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शासनाशी बोलू. राज्य शासन दुरुस्ती करणार असेल तर समन्वयाची भूमिका ठेऊ. जर शासनाने समन्वयाबाबत विचार केला नाही आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना विचारू की बाबांनो आता पुढे काय करायचे आहे. शेतकरी म्हणतील ते आम्ही करू.