शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मुख्यमंत्री व्हायची घाई नाही, मी पूर्ण समाधानी

By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही.

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही. आतापर्यंत मिळाले त्यात मी पूर्ण समाधानी आहे, असे कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे सांगितले. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकारांशी राजकीय विषयांवर संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलून फरक पडणार नाही. उलट एकदिलाने काम करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार या थेट प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले, मी सरकारमधला सिनिअर मोस्ट नेता आहे; पण आमच्या पक्षात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष बदलाचे निर्णय इथे होत नसतात. आमच्या पक्षात केवळ दोन ओळींचा ठराव होतो आणि सर्व अधिकार हायकमांडला दिले जातात. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आतापर्यंत खूप काही मिळाले आहे. छोट्या गावातून आलो असूनही आमदार झालो. गेली ३० वर्षे आमदार आहे. २० वर्षांपासून मंत्री आहे. एक मोठे विद्यापीठ सुरू केले. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये पूर्ण समाधानी आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कितपत यशस्वी होऊ शकेल? या प्रश्नावर पतंगराव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. हा पराभव मान्य करावाच लागेल; पण निवडणुकीत जय पराजय होत असतात. मी इंदिराजींना बघितले आहे, आणीबाणीनंतर पराभव झाल्यावर त्या कराडला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत केवळ पाच लोक होते; पण काही वर्षांतच त्यांनी भरघोस यश मिळविले. त्या पुन्हा सत्तेत आल्या. मोदी लाट आता विरली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो आहोत. अशोकराव राज्याचे नेतेआगामी विधानसभा निवडणुकीतील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र, अशोकराव हे मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील हे आत्ताच सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये सर्व त्या- त्या वेळी ठरते. त्यामुळे सध्या त्याविषयी चर्चा करणे योग्य नाही.