शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री व्हायची घाई नाही, मी पूर्ण समाधानी

By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही.

औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही. आतापर्यंत मिळाले त्यात मी पूर्ण समाधानी आहे, असे कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे सांगितले. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकारांशी राजकीय विषयांवर संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलून फरक पडणार नाही. उलट एकदिलाने काम करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार या थेट प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले, मी सरकारमधला सिनिअर मोस्ट नेता आहे; पण आमच्या पक्षात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष बदलाचे निर्णय इथे होत नसतात. आमच्या पक्षात केवळ दोन ओळींचा ठराव होतो आणि सर्व अधिकार हायकमांडला दिले जातात. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आतापर्यंत खूप काही मिळाले आहे. छोट्या गावातून आलो असूनही आमदार झालो. गेली ३० वर्षे आमदार आहे. २० वर्षांपासून मंत्री आहे. एक मोठे विद्यापीठ सुरू केले. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये पूर्ण समाधानी आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कितपत यशस्वी होऊ शकेल? या प्रश्नावर पतंगराव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. हा पराभव मान्य करावाच लागेल; पण निवडणुकीत जय पराजय होत असतात. मी इंदिराजींना बघितले आहे, आणीबाणीनंतर पराभव झाल्यावर त्या कराडला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत केवळ पाच लोक होते; पण काही वर्षांतच त्यांनी भरघोस यश मिळविले. त्या पुन्हा सत्तेत आल्या. मोदी लाट आता विरली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो आहोत. अशोकराव राज्याचे नेतेआगामी विधानसभा निवडणुकीतील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र, अशोकराव हे मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील हे आत्ताच सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये सर्व त्या- त्या वेळी ठरते. त्यामुळे सध्या त्याविषयी चर्चा करणे योग्य नाही.