शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

खैरेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:41 IST

एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकमेकांवर चिखलफेक करीत पाण्यात पाहणारे खा. चंद्रकांत खैरे आणि आ. हर्षवर्धन यांच्यात समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत खा. खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले, तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्वीकारतील, असा आशावाद व्यक्त केला.शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा. खैरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रणीत गटाकडून निवडून आलेल्या ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार संजय सिरसाट, हर्षवर्धन जाधव, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांना सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. कन्नड तालुक्यातील निवडून आलेल्या शिवसेनेच्या सरपंचांना प्रत्येक पाच लाख रुपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणुकीच्या वेळी खैरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली. आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नवीन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांना लवकर कळले. कधी-कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे, असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाट म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणुकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल.सध्या शिवसेनेचे ९६ सरपंच आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. शेवटी बोलताना खैरे म्हणाले, बºयाच दिवसांनी पुन्हा सामील झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्वीकारावेत. दुसºया पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतातनुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.