शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कामगारांची उपासमार

By admin | Updated: November 14, 2016 00:25 IST

लातूर : शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन उलाढा २० कोटींच्या घरात असून, गेल्या पाच दिवसांपासून ही उलाढालच कोलमडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत

लातूर : शहरातील बाजारपेठेतील दैनंदिन उलाढा २० कोटींच्या घरात असून, गेल्या पाच दिवसांपासून ही उलाढालच कोलमडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, कामगारांना मजुरी देण्यासाठी पैसेच नसल्यामुळे अनेक ठिकाणची कामे सध्याला बंद आहेत. काम असूनही पैशाअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी चौकातील कामगारांचा नाकाही गर्दी नसल्याने ओसाड असल्याचे चित्र आहे.५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना पैशाअभावी आपले व्यवहार थांबवावे लागले आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी हाती पैसाच नसल्यामुळे जीवनावश्यवक वस्तूंची खरेदीही करता आली नाही. गेल्या पाच दिवसांपासून शहरतील शाहू चौक, विवेकानंद चौक, बसवेश्वर चौक, गूळ मार्केट, सुभाष चौक, गंजगोलाई परिसर, सराफलाईन, गांधी चौक, गाव भाग, मिनी मार्केट, गांधी मार्केट, शाहू कॉलेज परिसर, अशोक हॉटेल, खोरी गल्ली, सावेवाडी परिसर, शिवाजी चौक, उषाकिरण थिएटर परिसर, पाण्याची टाकी, अश्वमेघ हॉटेल, पाच नंबर चौक, औसा रोड परिसर, नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, राजीव गांधी चौक, जुना आणि नवीन रेणापूर नाका आदीं परिसरात असलेल्या विविध राष्ट्रीयकृत बँका आणि एमटीएमवर गेल्या पाच दिवसांपासून पैसे मिळविण्यासाठी रात्रं-दिन रांगा लागून आहेत.दिवस-दिवस रांगेत थांबूनही पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आता बँकेच्या खातेदारांसह नागरिकांतून वाढल्या आहेत.