शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

साडेतीनशे शेतकऱ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

उस्मानाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील घोगरेवाडी येथील शेतकऱ्यांना डोंबिवली येथील विवेकानंद सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला.

उस्मानाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील घोगरेवाडी येथील शेतकऱ्यांना डोंबिवली येथील विवेकानंद सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला असून, या संस्थेच्या वतीने साडेतीनशे शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व खतांचे वाटप नुकतेच करण्यात आले. गेल्या दोन-तीन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, पैशांअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली येथील या संस्थेने सुमारे ८० हजार रूपये किमतीचे बी-बियाणे, जैविक खते देऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे. घोगरेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा खत, बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी विकास अधिकारी डी. आर. जाधव, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, संस्थेचे अध्यक्ष केतन बोंदर, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. चिक्षे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष बोंदर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेने हा मदतीचा हात दिल्याचे सांगून गावकऱ्यांनी एकजुटीने काम करून गावचा विकास साधावा. आधुनिक तंत्र व मार्केटींगचा अभ्यास करूनच शेतीचे उत्पन्न घ्यावे असे सांगितले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी केले. कार्यक्रमास विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक के. जी. सुरवसे यांनी केले तर चिक्षे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मॉडेल गाव बनवूयावेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी घोगरेवाडी गाव मॉडेल गाव करून या गावच्या शेतीच्या विकास कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करणाऱ्यांवर भर द्यावा. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहून शेतीचे नवनवीन तंत्रज्ञात आत्मसात करून आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.