शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खतांची शेकडो पोती भिजली

By admin | Updated: June 5, 2017 00:32 IST

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खतांची शेकडो पोती शनिवारी (दि.३) रात्री पडलेल्या पावसामुळे भिजली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने आलेली खतांची शेकडो पोती शनिवारी (दि.३) रात्री पडलेल्या पावसामुळे भिजली. उघड्यावर पडलेली खतांची पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. परंतु तरीही खतांचा बचाव होऊ शकला नाही.रेल्वेस्टेशन मालधक्क्यावर दोन दिवसांपूर्वी आलेल्या मालगाडीतील खतांची पोती उघड्यावर उतरविण्यात आली होती. ही पोती उचलण्याचे काम सुरू होते. शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खतांची अनेक पोती भिजली. ही पोती वाचविण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली. मात्र तरीही अनेक पोती भिजली. यात अनेक पोत्यांमधील दाणेदार खताचा (१०-२६-२६ आणि १४-३५-१४) चक्क चिखल झाला होता. याठिकाणी युरियाचीही अनेक पोती भिजलेली दिसून आली. पाण्यामुळे दाणेदार युरियाची पोती कडक झाली होती. ही भिजलेली पोती रविवारी (दि.४) तशीच ट्रकमध्ये लोड केली जात होती. आधीच शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत आहे. त्यात पेरणीपूर्वीच खत भिजण्याचा प्रकार झाला. ही पोती अशीच शेतकऱ्यांपर्यंत जाईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालधक्क्यावर खत आले आहे. परंतु पावसात भिजण्याच्या प्रकाराविषयी काहीही माहीत नाही.