शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

जिल्ह्यात दिवसाकाठी जळताहेत शेकडो रोहित्र; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: November 2, 2016 01:08 IST

जालना :विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत.

जालना : यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांना देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने दिवसाकाठी शेकडो जळत आहेत. महावितरणकडूनही रोहित्र दुरूस्त टाळाटाळ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जालना जिल्ह्यात महावितरणचे दोन विभाग आहे. विभाग एकमध्ये जालना, बदनापूर, भोकरदन , जाफराबाद तर दोन मध्ये मंठा परतूर, घनसावंगी, अंबड या तालुक्यांचा समावेश आहे. आठ तालुक्यात मिळून ६३ व १०० केव्हीएची १५ हजार रोहित्र आहेत. मात्र अनेक रोहित्रांची नियमित देखभाली नसल्याने तसेच शेतकरी थेट आकडे टाकत असल्याने रोहित्रांवर क्षमतेक्षा अधिक भार वाढून ते जळण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार दिवसाकाठी दहा रोहित्र जळत असले तरी जिल्ह्यात शेकडो रोहित्र दररोज जळतात अथवा बिघाड होत असल्याचे चित्र आहे. रोहित्र जळाल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना ते पिकांस देण्यास अडचणी येत आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता बी.टी. जाधव म्हणाले, ३० ते ४० रोहित्रांची दुरूस्ती बाकी आहे. रोहित्र दुरूस्तीसाठी चार एजन्सी आहेत. त्यांच्याकडून तात्काळ रोहित्र दुरूस्त करून घेण्यात येते. शेतकऱ्यांनी थेट आकडे टाकू नये, दाब योग्य राहण्यासाठी कॅपिसीटरचा वापर करावा. त्यामुळे रोहित्र जळणार नाहीत. शेतकऱ्यांनी अथवा ग्रामीण भागात आकडे वापरू नये. आकड्यांमुळे वीज वाहिनीसोबतच रोहित्रांवर दाब येऊन मोठे बिघाड होतात. वीजमीटर घेऊन व महावितरणने सांगितलेल्या नियमानुसार वीज वापर केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होणार नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. (प्रतिनिधी)