शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आयटीआयचे शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:50 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेऊन प्रशिक्षण (अ‍ॅप्रेंन्टिसशिप) कालावधीनंतर मंगळवारपासून घेण्यात येणाºया लेखी परीक्षेला शेकडो विद्यार्थी हॉलतिकीट मिळाले नसल्यामुळे मुकणार आहेत. यात महाविद्यालय प्रशासनाने चूक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर प्राचार्यांनी हे आरोप फेटाळत विद्यार्थ्यांनीच आॅनलाइन अर्ज भरले नसल्याचे सांगितले.आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष कोणत्याही कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागते. वर्षभर काम केल्यानंतर त्याविषयी लेखी परीक्षा घेण्यात येते. ही लेखी परीक्षा मंगळवापासून तीन दिवस शहरातील एका केंद्रावर होणार आहे. यासाठी २५ आॅक्टोबरपर्यंत परीक्षेसाठीचा अर्ज आॅनलाइन भरणे आवश्यक होते. या मुदतीत अर्ज भरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट मिळालेले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालय प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे ही चूक घडली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या चुकीची किंमत विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे; मात्र ओळखीच्या विद्यार्थ्यांना २५ आॅक्टोबरनंतरही अर्ज केल्यानंतर हॉलतिकीट देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. हॉलतिकीट न मिळालेल्यांमध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थी असून, त्याविषयी महाविद्यालय माहिती लपवून ठेवत आहे. यातील अनेक विद्यार्थी खेड्यातून शहरात शिक्षणासाठी आलेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी वाया जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य सलीम शेख यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी विद्यार्थ्यांची चूक असल्याचे सांगितले. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी डीटीईकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले.