शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शेकडो शेतकऱ्यांनी नाकारले शेततळे

By admin | Updated: May 12, 2016 00:53 IST

औरंगाबाद : तुटपुंज्या अनुदानामुळे जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत शेततळ्याचे काम करून घेण्यास शेतकरी उदासीन दिसत आहेत.

औरंगाबाद : तुटपुंज्या अनुदानामुळे जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत शेततळ्याचे काम करून घेण्यास शेतकरी उदासीन दिसत आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यातील अठराशे शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश दिले. परंतु त्यापैकी आतापर्यंत केवळ ७१ जणांनीच कामाला सुरुवात केली आहे. तर तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी मंजूर शेततळे नाकारले आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा ‘मागेल त्याला शेततळे’ ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तब्बल ११ हजार शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी शासनाने २४१७ शेततळ्यांचेच उद्दिष्ट दिलेले आहे. त्यामुळे या अकरा हजारांमधून २४१७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर लगेचच सुमारे अठराशे जणांना कार्यारंभ आदेश दिले. महिनाभरात शेततळ्यांचे काम पूर्ण करावे, असे अपेक्षित आहे. मात्र, या योजनेंतर्गत शेततळ्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांपर्यंतचेच अनुदान देय आहे. शेततळ्यासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येत असताना इतके कमी अनुदान मिळत असल्यामुळे शेतकरी या योजनेतून शेततळे घेण्यास उदासीनता दाखवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कार्यारंभ आदेश दिलेल्या अठराशेपैकी अवघ्या ७१ जणांनी कामाला सुरुवात केली आहे. बहुतेक शेतकरी अपुऱ्या अनुदानामुळे शेततळे घेण्याविषयी संभ्रमावस्थेत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी शासनाचे हे शेततळे नाकारले आहे. इतक्या कमी अनुदानात शेततळे तयार करणे शक्य नसल्यामुळे ते घेणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी लेखी दिले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे तीनशेहून अधिक जणांनी शेततळे नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.