लोकमत न्यूज नेटवर्कबाºहाळी : रविवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे बाºहाळी परिसरातील सुमारे दीड हजार एकर परिसरातील उसाचे नुकसान झाले़बाºहाळीसह थोटवाडी, बापशेटवाडी, सुगाव कॅम्प, पैैसमाळ, मौलालीमाळ, मांजरी, निवळी, हिप्पळनारी, सकनूर, कबनूर आदी गावांमध्ये उसाचे जवळपास १५०० एकर क्षेत्र आहे़ जूनपासून पाऊस जेमतेम झाला तरी परिसरात उसाची वाढ चांगली झाली होती़ त्यामुळे शेतकरी आनंदीत होते़ मात्र २२ आॅक्टोबरच्या पावसाने शेतकºयांच्या आनंदावर विरजन पसरविले़ जवळपास सर्वच ऊस जमीनदोस्त झाला़ सोबत मुळीसुद्धा उपटल्या गेल्या़ त्यामुळे पुढील दोन वर्षे येणारे खोडवा पीकही अधांतरी झाले़ऊस पडल्यामुळे त्याला उंदीर लागणे, मुळ्या फुटणे, रानडुकरांचा त्रासही मोठ्या प्रमाणात सुरू झाला़ त्यात पाण्याची कमतरता असल्याने उसाच्या वजनात मोठी घट होईल हे निश्चित आहे़ याशिवाय तोडणी करणाºया मजुरांकडूनही पिळवणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे़
दीड हजार एकर ऊसाचे पावसामुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:11 IST