शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

दिवाळीसाठी शंभरावर बसेस

By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक विविध कामांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी विविध भागात वास्तव्यास आहेत़ दिवाळी सणानिमित्त या नागरिकांचा ओढा गावाकडे

उस्मानाबाद : जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक विविध कामांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी विविध भागात वास्तव्यास आहेत़ दिवाळी सणानिमित्त या नागरिकांचा ओढा गावाकडे असल्याने त्यांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून जवळपास १०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे़उस्मानाबाद शहरासह परिसरातील अनेक नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक शहरात कामानिमित्त वास्तव्यास आहेत़ विशेषत: खासगी नोकरीसाठी गेलेल्या युवकांची, कुटुंबाची संख्या यात अधिक आहे़ दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने ही मंडळी गावाकडे परततात़ मात्र, गावाकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बसेससह इतर वाहनाअभावी प्रवाशांची गैरसोय ठरलेली असते़ ही गैरसोय टाळण्यासाठी उस्मानाबाद आगाराने जवळपास १०० बसेसचे नियोजन केले आहे़ सद्यस्थितीत उस्मानाबाद आगारातून सहा, उमरगा आगारातून नऊ, भूम आगारातून १३, तुळजापूर विभागातून सहा, कळंब आगारातून पाच बसेस पुणे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत़ तर नाशिककडे कळंब आगारातून एक, औरंगाबादकडे उमरगा आगारातून दोन तर साताऱ्याकडे तुळजापूर आगारातून एक बस असे जादा बसेसचे नियोजन असून, आवश्यकतेनुसार बसेस वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ शिवाय पुणे येथील पिंपरी चिंचवड, इंजिनिअरिंग महाविद्यालय, शिवाजीनगर, स्वारगेट येथील बसस्थानकावर दहा कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असून, हे या भागातील प्रवाशांची सोय पाहत असल्याचे विभाग नियंत्रक नवनित भानप यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)