शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी जैन धर्माकडून शिकावी...

By admin | Updated: April 17, 2016 01:35 IST

औरंगाबाद : भगवान महावीर जयंतीमधील खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा वाटप आणि चारा छावण्या उभारून सकल जैन समाजाने मानवधर्म मोठा असल्याचे दाखवून दिले आहे.

औरंगाबाद : भगवान महावीर जयंतीमधील खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा वाटप आणि चारा छावण्या उभारून सकल जैन समाजाने मानवधर्म मोठा असल्याचे दाखवून दिले आहे. माणुसकी काय असते हे जैन धर्मीयांकडून शिकावे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे काढले. महानगरपालिकेच्या वतीने महावीर चौक येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘महावीर कीर्ती स्तंभा’चे लोकार्पण शनिवारी सकाळी रामदास कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, महापौर त्र्यंबक तुपे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, रेणुकादास वैद्य, विरोधी पक्षनेते अज्जू पहिलवान, नगरसेवक गजानन बारवाल, राखी देसरडा, कीर्ती शिंदे, रेशमा कुरेशी, सुनीता अहुलवार, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर रामदास कदम यांनी महावीर कीर्ती स्तंभावर पुष्पवृष्टी करून स्तंभाचे लोकार्पण केले. रामदास कदम पुढे म्हणाले की, महावीर चौकात उड्डाणपूल उभारताना ‘महावीर स्तंभ’ अन्यत्र हलविण्यात येणार होता तेव्हा जैन समाजातून तीव्र भावना व्यक्त होत असल्याचे मला कळाले. महावीर स्तंभ तेथेच राहावा यासाठी मी पुढाकार घेतला. त्यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकारी, समाजबांधवांनी सामंजस्याची भूमिका घेतली व संयम दाखविला हे वाखाणण्याजोगे होय. या सामंजस्यातूनच आज सुंदर महावीर कीर्ती स्तंभ उभा राहिला आहे. आपल्या मानवतावादी कार्याने जैन समाजाने अन्य समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. शहरवासीयांना अभिमान वाटावा अशा महावीर कीर्ती स्तंभाचे नूतनीकरण करण्यात आल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले. शहराच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान असल्याचे आ. संजय शिरसाट म्हणाले. प्रारंभी, प्रास्ताविक प्रशांत देसरडा यांनी केले. शहरातील सकल जैन समाज एकजूट असल्याचे सांगत माजी महापौर विकास जैन यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी यांनी केले. सकल जैन समाजाचे कोषाध्यक्ष जी.एम. बोथरा, उपाध्यक्ष ललित पाटणी, चांदमल सुराणा, डॉ. शांतीलाल संचेती, प्रकाश बाफना, रतिलाल मुगदिया, विलास साहुजी, जिनदास मोगले, रवी मुगदिया, संजय संचेती, अशोक अजमेरा, विकास रायमाने, रमण साहुजी, शांतीनाथ गोसावी जन्मकल्याणक समितीचे वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, मिठालाल कांकरिया, भारती बागरेचा आदी पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी न्या. कैलासचंद चांदीवाल, अखिल मारवाडी महासभेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरख, महोत्सव समितीचे संतोष पापडीवाल, नीलेश सावलकर, नीलेश पहाडे, संजय सुराणा, सुनील वायकोस, सकल जैन समाजाचे माणिक गंगवाल, एम.आर. बडजाते, ताराचंद बाफना, डॉ. सन्मती ठोळे, डॉ. रमेश बडजाते, नरेंद्र गेल्डा, विजयराज संघवी, चांदमल सुराणा, राजेंद्र सेठिया, सोहनराज धोका, राजेंद्र डोसी, सुरेश सेठी, जितो ग्रुपचे सुभाष नाहर, गौतम संचेती, वाळूज येथील जि.प. सदस्य अनिल चोरडिया तसेच हडको जैन मंदिर येथील विलास जोगी, दिगंबर क्षीरसागर, प्रभाकर कुंटे, बाहुबली वायकोस, जैन इंजिनिअरिंगचे नितीन बोरा, राजेश पाटणी, गुरू परिवारचे अमोल पाटणी, अनुज दगडा तसेच विलास पाटणी, प्रकाश मुगदिया, पंकज फुलपगर, भरत ठोळे, हितेश कांकरिया, रोहित छाजेड, अजिंक्य संघवी, नीलेश सेठी, सुनील सेठी, नीलेश पहाडे, कुंतीलाल हिरण, स्वप्नील पारख, महेंद्र बंब, विशाल कांकरिया, राजेश मुथा, राजेश जैन, मनोज बोरा, सुभाष देसरडा, पारस ओसवाल, राजेश पगारिया, दिलीप खिंवसरा, डॉ. तातेड, भरत ठोले, अशोक गंगवाल, प्रमोद पांडे, विनोद लोहाडे, रवी लोढा तसेच करुणा साहुजी, भावना सेठिया, मंगल पारख, कविता अजमेरा, मंगला गोसावी, मंदा वायकोस, मधू जैन, कमलाबाई ओसवाल, सुषमा साहुजी, नंदा साहुजी, निमा पापडीवाल, मंजू पाटणी, सीमा पाटणी, नीता ठोले, नंदा मुथा, नीता संचेती, पुष्पा बाफना, अल्पा जैन, मेघा सुगंधी, प्रीती सेठी यांच्यासह सकल जैन समाज बांधवांची उपस्थिती होती. 1 महावीर कीर्ती स्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रामदास कदम वेळेच्या अगोदर आले व सकाळी ८.३० वाजता त्यांनी महावीर स्तंभाचे लोकार्पण केले. कदम हे आज प्रचंड मूडमध्ये होते. त्यांनी आपल्या भाषणात चौकार, षटकार मारीत चौफेर फटके बाजी केली. मित्र पक्षाचे चिमटे काढले अन् सर्वांना पोटधरून हसविले. 2 कदम म्हणाले की, आपण कार्यक्रमात वेळेच्या अगोदर आलात असे उद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढताच मी त्यांना म्हणालो की, जनता लोकप्रतिनिधी निवडून देतात. निवडून आल्यानंतर जनतेला त्यांची वाट पाहावी लागू नये, या मताचा मी आहे. (हंशा), त्यामुळे मी ८.३० वाजेच्या कार्यक्रमाला १५ मिनिटे लवकर आलो. लोकांचा वेळ वाया घालविला नाही. (हंशा)3 आ.अतुल सावे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा उल्लेख करीत श्रीक्षेत्र मांगीतुंगीसाठी आम्ही कसे सहकार्य केले हे सांगितले. रामदास कदम यांनी नंतर आपल्या भाषणात याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आ.सावेजी तुम्ही विसरलात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केंद्रात सत्ता आणण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. आपण दोघे भाऊ-भाऊ आहोत. (हशा) प्रत्येक वेळी कावीळ झाल्यासारखे का गडकरी, मुंडे यांचे नाव घेता (हंशा), सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांनीच आदेश दिले, हे का तुम्ही विसरता. (हशा)4 कदम म्हणाले की, राजेंद्र दर्डा माझे भाऊ आहेत. त्यांच्याविषयी आपुलकी, जिव्हाळा खूप आहे. हनुमानाने छाती फाडून हृदयातील श्रीराम दाखविले होते. मात्र, मी हनुमान नसून ‘रामदास’ असल्याने मी तसे दाखवू शकत नाही. (हशा).