शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बीडमध्ये सकल राजस्थानी समाजाचा विशाल मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:49 IST

जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूक मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूकमोर्चा काढण्यात आला. यात जिल्हाभरातून तसेच जालना, अंबड येथील राजस्थानी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.पेठ भागातील बालाजी मंदिरापासून सकाळी दहा वाजता मूकमोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चेकºयांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. डॉ. आंबेडकर चौक, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, बसस्थानक, शिवाजी पुतळा, नगर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर सभेत भगीरथ बियाणी, सुभाष सारडा, सत्यनारायण लाहोटी, गंमत भंडारी, नंदकिशोर मुंदडा, नितीन कोटेचा, जुगलकिशोर लोहिया, विजयराज बंब, जि. प. चे माजी अध्यक्ष, विजयसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, न. प. उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, शिवसंग्रामचे नेते राजेंद्र मस्के, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष गोविंद बजाज, जि. प. सदस्य अशोक लोढा, अंबड निवासी पुरुषोत्तम सोमाणी यांची भाषणे झाली. गोविंद गगराणी याच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, या प्रकरणात पोलीस अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, यमराज ग्रुपची चौकशी करुन दोषींना अटक करावी आदी मागण्या वक्त्यांनी भाषणातून केल्या. या वेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी फोनद्वारे भावना व्यक्त करुन मोर्चाला पाठींबा दिला. दिवंगत गोविंद गगराणी यास श्रध्दांजलीनंतर जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये सत्यनारायण लाहोटी, नंदकिशोर मुंदडा, सुरेशचंद्र लड्डा, सुभाष सारडा, नितीन कोटेचा, विजयराज बंब, संतोष सोहनी, आदित्य सारडा, भगीरथ चरखा, शांतीलाल पटेल, अशोक लोढा, मदन दुगड, गिरीश सोहनी, संतोष चरखा, शुभम धूत , दिलीप सोहनी, किशोर बाहेती, अमर सारडा, हनुमान मंत्री, अमृत सारडा, दिलीप मंत्री, मनमोहन कलंत्री, प्रदीप चितलांगे, शाम पारीख, अशोक तिवारी, बिपीन लोढा, सचिन कांकरीया, बालाप्रसाद तापडिया, जयनारायण अग्रवाल, पारस बोरा, अक्षय मुंदडा, सुभाष बाहेती, विनोद मुंदडा, मदनलाल अग्रवाल, रोहित अग्रवाल, जवाहर कांकरिया, राजेंद्र मुनोत, विष्णुदास तापडीया, रामेश्वर कासट, दिलीप मंत्री, दिनेश मुंदडा, पुरुषोत्तम रांदड, ओमप्रकाश भुतडा, अमर बाहेती, रामेश्वर बियाणी, सुभाष जाखेटिया, जुगलकिशोर लोहिया, नंदकिशोर तोतला, चंदुलाल बियाणी, जयपाल लाहोटी, गोविंद बजाज, जुगल झंवर, राधेश्याम लोहिया, राजेंद्र इंदाणी, राधेश्याम अट्टल, गोपाल सोनी, डॉ. सिकची यांच्यासह हेमंत क्षीरसागर,अमर नाईकवाडे, अनिल जगताप, फारुक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, सुहास पाटील, भरत झांबरे, जयसिंह चुंगडे, बिभीषण लांडगे, अंबाजोगाईचे नगरसेवक संतोष शिनगारे, नगरसेवक दिनेश भराडीया तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले.