शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

औरंगाबादमधील लघु उद्योगांसमोरील समस्या डोंगराएवढ्या मोठ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:31 IST

उद्योगाांना बेसिक सुविधा देण्यात येथील प्रशासकीय यंत्रणा कमी पडते आहे. 

ठळक मुद्दे५० कोटींच्या आसपास मालमत्ताकर उद्योजक देतात ८० देशांत येथून उत्पादने निर्यात केली जातात.

औरंगाबाद : महापालिका आणि एमआयडीसी चिकलठाण्यातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लघुउद्योजकांसमोर डोंगराएवढ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, अनियमित वीजपुरवठा, वाढीव जल:निस्सारण कर, चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण, पथदिवे नसल्यामुळे येथील उद्योजक त्रस्त झाले आहेत. या सगळ्या समस्यांना वैतागून उद्योजकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. 

मनपाच्या हद्दीत चिकलठाणा औद्योगिक वसाहत असतील, तर बांधकाम परवानगी एमआयडीसीकडूनच घ्यावी लागते. विकास शुल्क एमआयडीसीने घ्यायचा आणि पायाभूत सुविधा मनपाकडून मिळवायच्या, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्योगाांना बेसिक सुविधा देण्यात येथील प्रशासकीय यंत्रणा कमी पडते आहे. १९८९ मध्ये त्या औद्योगिक वसाहतीचे मनपाकडे हस्तांतरण झाले. मालमत्ता व इतर कर मनपाकडे उद्योजक अदा करीत आहेत. ५० कोटींच्या आसपास मालमत्ताकर उद्योजक देतात, असा मसिआ संघटनेचा दावा आहे. ८० देशांत येथून उत्पादने निर्यात केली जातात. चिकलठाणा औद्योगिक वसाहत विमानतळाच्या अतिशय जवळ आहे. त्यामुळे विमान कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. बाहेरून येणाऱ्या उद्योजकांच्या विमानांना पार्किंगची सुविधादेखील वेळेत मिळत नाही. प्रवासी संख्येच्या अटींवर विमानसेवा सुरू केली जाईल, अशा पद्धतीने वेठीस धरले जाते, असे मसिआचे सचिव मनीष गुप्ता म्हणाले. 

२०११ मध्ये झाले २० कोटींतून रस्तेचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत एकूण २३ कि़मी.रस्ते आहेत. त्या रस्त्यांवर २०११ मध्ये मनपाने २० कोटी रुपयांचा खर्च केला होता. त्यानंतर आजवर रस्त्यांची साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नाही. १०० कोटींच्या अनुदानात चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील फक्त एक रस्ता मंजूर करण्यात आला आहे. महावितरण आणि मनपाच्या अंतर्गत वादामुळे वीजपुरवठा यंत्रणांचे काम रखडले आहे. जालना रोडवरील हॉटेलमधील कचरा एमआयडीसीमध्ये आणून टाकला जात आहे. त्याचा परिणाम कामगारांवर होत आहे. 

७०० लहान-मोठ्या उद्योगांची साखळी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ७०० लहान-मोठ्या उद्योगांची साखळी आहे. ४३७ मसिआ या संघटनेचे सदस्य आहेत. पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे नवीन उद्योगांची या भागात येण्याची इच्छा राहिलेली नाही, उलट येथील उद्योग गुजरात आणि तेलंगणा राज्यात जाऊ लागले आहेत. सिडकोप्रमाणे एमआयडीसीने ही वसाहत फ्रीहोल्ड करून टाकावी, अशी मागणी मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी केली. जड वाहतूक रात्रीशिवाय वसाहतीमध्ये येत नाही. कच्चा माल रात्रीतून कंपनीत आणावा लागतो. त्यातही पथदिवे नाहीत, रस्ते खराब असल्यामुळे मालवाहतुकीला जास्तीची रक्कम मोजावी लागते. येथील उद्योजकांची कनेक्टिव्हिटी तुटली आहे. रस्त्यांसाठी किमान ४६ कोटींचा निधी लागेल. तो उपलब्ध करून देण्याची मसिआची मागणी आहे.

वाळूजमध्ये कचरा डेपोकडे दुर्लक्षवाळूज बी-सेक्टरमध्ये अत्याधुनिक कचरा डेपो करण्याचा निर्णय झाला; परंतु त्यावर अद्याप काहीही झालेले नाही. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीबरोबर करार करण्यात आला; पण त्याचे पुढे काहीही झाले नाही. तेथे रोज कचरा आणून टाकण्यात येत आहे. अज्ञातांकडून तो कचरा जाळला जात आहे. वाळूजमध्ये रोज धूरच धूर, अशी अवस्था दिसून येते. तेथे नव्याने कचरा आणून टाकणे थांबविले पाहिजे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना या दुर्गंधीचा त्रास होतो आहे, तसेच गोलवाडी येथील पुलाचा कठडा तुटलेला असून, त्याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता मसिआचे जनसंपर्क अधिकारी मनीष अग्रवाल यांनी वर्तविली. 

डीएमआयसीमध्ये लघुउद्योजकांना आरक्षण हवेडीएमआयसीमध्ये लघुउद्योजकांसाठी प्लॉटचे आरक्षण केले पाहिजे. ५ ते १० हजार स्क्वे.फु.चा भूखंड लघुउद्योजकांसाठी लागतो. मोठ्या उद्योगांना समोर ठेवूनच भूखंड विक्रीस काढण्यात आले आहेत. असे मसिआ अध्यक्ष राठी म्हणाले.४ भाडेकरू उद्योजकांचे प्रकरण ८ वर्षांपूर्वी निकालात निघाले आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सव्वा एकर जागा आहे. त्यावर १६७ छोट्या उद्योजकांचे गाळे उभे राहतील; परंतु ती जागा एमआयडीसीने हस्तांतरित केली नाही, असा आरोपही राठी यांनी केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरbusinessव्यवसायState Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका