शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

अतिक्रमणांच्या प्रचंड तक्रारी; प्रशासनाला आला वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या ...

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या वाढत्या अतिक्रमणांच्या तक्रारीही प्रशासनाला प्राप्त होत आहेत. खासगी तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या तक्रारींमुळे प्रशासनालाही आता जाम वैताग आला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे वर्षभरात साधारणपणे दीड हजार तक्रारी प्राप्त होतात. कारवाईचे प्रमाण अवघे दहा टक्के आहे. ९० टक्के तक्रारींचे निरसन होत नाही. कारवाईच्या अपेक्षेने नागरिक महापालिका मुख्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. संबंधित विभागाकडून न्याय न मिळाल्यास नागरिक महापालिका प्रशासकांकडे धाव घेतात. प्रशासक कार्यालयात दोन ते चार तास बसले तरी नागरिक अलोट गर्दी करतात. प्रशासकांच्या कार्यालयाला जनता दरबारासारखे स्वरूप प्राप्त होते. आलेले बहुतांश नागरिक अतिक्रमणांची संबंधित तक्रार घेऊन येतात. प्रत्येक तक्रार अर्जावर आयुक्तांना कारवाईचे आदेश किंवा चौकशीचे आदेश द्यावे लागतात. अतिक्रमणांच्या तक्रारींचा आता प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनाही जाम वैताग आला आहे.

महापालिकेकडे प्राप्त तक्रारींचे स्वरूप

अनधिकृत घरांचे बांधकाम, नाल्याच्या आसपासची जागा बळकावणे, महापालिकेच्या मालकीची खुली जागा असेल तर हळूहळू अतिक्रमण करणे, डीपी रोडवर प्लॉटिंग पाडणे, अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणे, अनाधिकृत प्लॉटिंग, एखाद्या नागरिकाच्या प्लॉटवर बळजबरी अतिक्रमण करून बसणे, बांधकाम करताना शेजारच्या जमिनीवर अतिरिक्त बांधकाम, छोट्या गल्ल्या बळकावणे अशा असंख्य प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात.

तक्रारींमध्ये सार्वजनिक हित नाही

रस्त्यावर होणारी अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे सार्वजनिक हिताच्या तक्रारी क्वचितच प्राप्त होतात. अनेक तक्रारी सूडबुद्धीने केलेल्या असतात. मनपाला कारवाई केली तरी त्रास, नाही केली तरी त्रास असतोच, हे विशेष.

मनपाच्या जागांना सर्वाधिक प्राधान्यक्रम

काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव पथकाने महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य दिले आहे. टिळक नगर, किलेअर्क येथील कोट्यवधी रुपयांच्या जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा