शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अतिक्रमणांच्या प्रचंड तक्रारी; प्रशासनाला आला वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या ...

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या वाढत्या अतिक्रमणांच्या तक्रारीही प्रशासनाला प्राप्त होत आहेत. खासगी तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या तक्रारींमुळे प्रशासनालाही आता जाम वैताग आला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे वर्षभरात साधारणपणे दीड हजार तक्रारी प्राप्त होतात. कारवाईचे प्रमाण अवघे दहा टक्के आहे. ९० टक्के तक्रारींचे निरसन होत नाही. कारवाईच्या अपेक्षेने नागरिक महापालिका मुख्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. संबंधित विभागाकडून न्याय न मिळाल्यास नागरिक महापालिका प्रशासकांकडे धाव घेतात. प्रशासक कार्यालयात दोन ते चार तास बसले तरी नागरिक अलोट गर्दी करतात. प्रशासकांच्या कार्यालयाला जनता दरबारासारखे स्वरूप प्राप्त होते. आलेले बहुतांश नागरिक अतिक्रमणांची संबंधित तक्रार घेऊन येतात. प्रत्येक तक्रार अर्जावर आयुक्तांना कारवाईचे आदेश किंवा चौकशीचे आदेश द्यावे लागतात. अतिक्रमणांच्या तक्रारींचा आता प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनाही जाम वैताग आला आहे.

महापालिकेकडे प्राप्त तक्रारींचे स्वरूप

अनधिकृत घरांचे बांधकाम, नाल्याच्या आसपासची जागा बळकावणे, महापालिकेच्या मालकीची खुली जागा असेल तर हळूहळू अतिक्रमण करणे, डीपी रोडवर प्लॉटिंग पाडणे, अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणे, अनाधिकृत प्लॉटिंग, एखाद्या नागरिकाच्या प्लॉटवर बळजबरी अतिक्रमण करून बसणे, बांधकाम करताना शेजारच्या जमिनीवर अतिरिक्त बांधकाम, छोट्या गल्ल्या बळकावणे अशा असंख्य प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात.

तक्रारींमध्ये सार्वजनिक हित नाही

रस्त्यावर होणारी अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे सार्वजनिक हिताच्या तक्रारी क्वचितच प्राप्त होतात. अनेक तक्रारी सूडबुद्धीने केलेल्या असतात. मनपाला कारवाई केली तरी त्रास, नाही केली तरी त्रास असतोच, हे विशेष.

मनपाच्या जागांना सर्वाधिक प्राधान्यक्रम

काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव पथकाने महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य दिले आहे. टिळक नगर, किलेअर्क येथील कोट्यवधी रुपयांच्या जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा