शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

अतिक्रमणांच्या प्रचंड तक्रारी; प्रशासनाला आला वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या ...

औरंगाबाद : शहरात भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शासकीय आणि महापालिकेच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. या वाढत्या अतिक्रमणांच्या तक्रारीही प्रशासनाला प्राप्त होत आहेत. खासगी तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या तक्रारींमुळे प्रशासनालाही आता जाम वैताग आला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे वर्षभरात साधारणपणे दीड हजार तक्रारी प्राप्त होतात. कारवाईचे प्रमाण अवघे दहा टक्के आहे. ९० टक्के तक्रारींचे निरसन होत नाही. कारवाईच्या अपेक्षेने नागरिक महापालिका मुख्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. संबंधित विभागाकडून न्याय न मिळाल्यास नागरिक महापालिका प्रशासकांकडे धाव घेतात. प्रशासक कार्यालयात दोन ते चार तास बसले तरी नागरिक अलोट गर्दी करतात. प्रशासकांच्या कार्यालयाला जनता दरबारासारखे स्वरूप प्राप्त होते. आलेले बहुतांश नागरिक अतिक्रमणांची संबंधित तक्रार घेऊन येतात. प्रत्येक तक्रार अर्जावर आयुक्तांना कारवाईचे आदेश किंवा चौकशीचे आदेश द्यावे लागतात. अतिक्रमणांच्या तक्रारींचा आता प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनाही जाम वैताग आला आहे.

महापालिकेकडे प्राप्त तक्रारींचे स्वरूप

अनधिकृत घरांचे बांधकाम, नाल्याच्या आसपासची जागा बळकावणे, महापालिकेच्या मालकीची खुली जागा असेल तर हळूहळू अतिक्रमण करणे, डीपी रोडवर प्लॉटिंग पाडणे, अनधिकृत मोबाइल टॉवर उभारणे, अनाधिकृत प्लॉटिंग, एखाद्या नागरिकाच्या प्लॉटवर बळजबरी अतिक्रमण करून बसणे, बांधकाम करताना शेजारच्या जमिनीवर अतिरिक्त बांधकाम, छोट्या गल्ल्या बळकावणे अशा असंख्य प्रकारच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होतात.

तक्रारींमध्ये सार्वजनिक हित नाही

रस्त्यावर होणारी अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी अतिक्रमणे सार्वजनिक हिताच्या तक्रारी क्वचितच प्राप्त होतात. अनेक तक्रारी सूडबुद्धीने केलेल्या असतात. मनपाला कारवाई केली तरी त्रास, नाही केली तरी त्रास असतोच, हे विशेष.

मनपाच्या जागांना सर्वाधिक प्राधान्यक्रम

काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव पथकाने महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवरील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य दिले आहे. टिळक नगर, किलेअर्क येथील कोट्यवधी रुपयांच्या जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा