शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘शॉक ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:23 IST

महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देचार तास वीजपुरवठा खंडित : सातारा-देवळाईसह परिसर अंधारात, विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला

औरंगाबाद : महावितरणच्या गलथान कारभारामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या तोंडावर बुधवारी रात्री शॉक बसला. सातारा-देवळाईसह परिसरातील विविध भागांतील वीजपुरवठा रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडित झाला. परिणामी हा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. रात्री बारावाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.बारावीच्या परीक्षांना गुरुवारपासून (२१) सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर आहे. इंग्रजी विषयाविषयी आधीच भीती बाळगली जाते. त्यामुळे पेपरच्या काही तास अगोदर मिळणाऱ्या वेळेत विद्यार्थी अभ्यासाला प्राधान्य देतात. पहिल्या पेपरला सामोरे जाण्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना अडचणीला सामोरे जाण्याचा प्रकार बुधवारी रात्री झाला. सातारा-देवळाई परिसरातील वीज रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक ‘गुल’ झाली. काही मिनिटांत लाईट परत येईल, या आशेने नागरिकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले; परंतु अर्धा तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. एमआयटी परिसरापासून देवळाईपर्यंतचा संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या प्रकारामुळे बारावीचे विद्यार्थी असलेल्या घरातील पालकांची चिंता वाढली. बराच वेळ प्रतीक्षा करूनही पुरवठा सुरळीत होत नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला. सातारा परिसरात बिघाड झाला असून वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागेल, काम सुरूआहे, अशी उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.मोबाईल, चार्जेबल लाईटच्या उजेडात अभ्यासबारावीची परीक्षा सुरू होणार असतानाच महावितरणने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला.३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाडसातारा परिसरात ३३ के. व्ही. लाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सातारा-देवळाईतील वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम सुरूआहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास दिली. आणखी एक तास दुरुस्तीला लागेल, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद