शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

एचआरसीटी चाचण्यांमुळे केंद्रीय पथक भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता या तपासणीची अजिबात गरज नाही. रुग्णांमधील लक्षणे, रक्त चाचणीचा अहवाल उपचार करण्यासाठी पुरेसे आहे. एचआरसीटी केल्याने उपचारात बदल होतो का असा संतप्त सवालही शनिवारी केंद्रीय पथकाने उपस्थित केला. गरज नसताना केलेल्या चाचण्या म्हणजे रुग्णांना निव्वळ आर्थिक भुर्दंड होय, असे मतही केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाने पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दौरा केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. शनिवारी घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हजर होते.

कोरोना रुग्णांना शहरात सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला लावली जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. रुग्णाची लक्षणे आणि त्याचा रक्त चाचणी अहवाल हेच कोरोना रुग्णात उपचारासाठी दिशादर्शक आहे. एचआरसीटी केल्यामुळे उपचारात बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच तो करावा. एरव्ही एक्स रे केला तरी पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व डॉक्टरांना ताकीद द्या, अशी सूचना पथकाने डॉ. पाडळकर यांना सांगितले.