शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

एचआरसीटी चाचण्यांमुळे केंद्रीय पथक भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता या तपासणीची अजिबात गरज नाही. रुग्णांमधील लक्षणे, रक्त चाचणीचा अहवाल उपचार करण्यासाठी पुरेसे आहे. एचआरसीटी केल्याने उपचारात बदल होतो का असा संतप्त सवालही शनिवारी केंद्रीय पथकाने उपस्थित केला. गरज नसताना केलेल्या चाचण्या म्हणजे रुग्णांना निव्वळ आर्थिक भुर्दंड होय, असे मतही केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाने पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दौरा केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. शनिवारी घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हजर होते.

कोरोना रुग्णांना शहरात सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला लावली जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. रुग्णाची लक्षणे आणि त्याचा रक्त चाचणी अहवाल हेच कोरोना रुग्णात उपचारासाठी दिशादर्शक आहे. एचआरसीटी केल्यामुळे उपचारात बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच तो करावा. एरव्ही एक्स रे केला तरी पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व डॉक्टरांना ताकीद द्या, अशी सूचना पथकाने डॉ. पाडळकर यांना सांगितले.