शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी चाचण्यांमुळे केंद्रीय पथक भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता या तपासणीची अजिबात गरज नाही. रुग्णांमधील लक्षणे, रक्त चाचणीचा अहवाल उपचार करण्यासाठी पुरेसे आहे. एचआरसीटी केल्याने उपचारात बदल होतो का असा संतप्त सवालही शनिवारी केंद्रीय पथकाने उपस्थित केला. गरज नसताना केलेल्या चाचण्या म्हणजे रुग्णांना निव्वळ आर्थिक भुर्दंड होय, असे मतही केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाने पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दौरा केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. शनिवारी घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हजर होते.

कोरोना रुग्णांना शहरात सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला लावली जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. रुग्णाची लक्षणे आणि त्याचा रक्त चाचणी अहवाल हेच कोरोना रुग्णात उपचारासाठी दिशादर्शक आहे. एचआरसीटी केल्यामुळे उपचारात बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच तो करावा. एरव्ही एक्स रे केला तरी पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व डॉक्टरांना ताकीद द्या, अशी सूचना पथकाने डॉ. पाडळकर यांना सांगितले.