शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एचआरसीटी चाचण्यांमुळे केंद्रीय पथक भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता या तपासणीची अजिबात गरज नाही. रुग्णांमधील लक्षणे, रक्त चाचणीचा अहवाल उपचार करण्यासाठी पुरेसे आहे. एचआरसीटी केल्याने उपचारात बदल होतो का असा संतप्त सवालही शनिवारी केंद्रीय पथकाने उपस्थित केला. गरज नसताना केलेल्या चाचण्या म्हणजे रुग्णांना निव्वळ आर्थिक भुर्दंड होय, असे मतही केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाने पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दौरा केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. शनिवारी घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हजर होते.

कोरोना रुग्णांना शहरात सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला लावली जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. रुग्णाची लक्षणे आणि त्याचा रक्त चाचणी अहवाल हेच कोरोना रुग्णात उपचारासाठी दिशादर्शक आहे. एचआरसीटी केल्यामुळे उपचारात बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच तो करावा. एरव्ही एक्स रे केला तरी पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व डॉक्टरांना ताकीद द्या, अशी सूचना पथकाने डॉ. पाडळकर यांना सांगितले.