शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी स्कोअर तब्बल २१, पण ७८ वर्षीय आजोबा झाले ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : ‘एचआरसीटी’ स्कोअर तब्बल २१...ऑक्सिजन पातळी ७५ आणि रुग्ण व्हेंटिलेटर...तेही तब्बल १३ दिवस...हे वाचून अनेकांच्या तोंडातून अरे देवा...असाच ...

औरंगाबाद : ‘एचआरसीटी’ स्कोअर तब्बल २१...ऑक्सिजन पातळी ७५ आणि रुग्ण व्हेंटिलेटर...तेही तब्बल १३ दिवस...हे वाचून अनेकांच्या तोंडातून अरे देवा...असाच शब्द बाहेर पडेल. एचआरसीटी स्कोअर ९ च्या पुढे गेला की एकच चिंता व्यक्त होते. पण डाॅक्टर, परिचारिकांचे प्रयत्न, योग्य उपचार आणि रुग्णाची सकात्मकता, या सगळ्यामुळे एचआरसीटी स्कोअर २१ आणि १३ दिवस व्हेंटिलेटरवर असलेले ७८ वर्षीय आजोबा जिल्हा सामान्य रुग्णालयातून शुक्रवारी ठणठणीत होऊन घरी परतले.

सुभाष जाधव (रा. गंगापूर) असे ७८ व्या वर्षी कोरोनावर विजय मिळविणाऱ्या आजाेबांचे नाव आहे. गंगापूर येथून त्यांना २० एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताना त्याचा एचआरसीटी स्कोअर २१ होता, ऑक्सिजन पातळी तर ७५ पर्यंत घसरलेली होती. त्यामुळे प्रकृती गंभीर होती. रुग्णाच्या उपचाराचे आव्हान जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी स्वीकारले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने दाखल होताच रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागले. उपचार सुरू केल्यानंतर व्हेंटिलेटरवरच रुग्णाचा एक दिवस पुढे जात होता. ३ मे पर्यंत म्हणजे तब्बल १३ दिवस व्हेंटिलेटर राहिला. उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. कोरोनाची लागण होण्यापूर्वी रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतलेला होता. त्याचाही फायदा झाला. ३ मे रोजी रुग्णाचा व्हेंटिलेटर निघाला. त्यानंतर जनरल वाॅर्डात उपचार करण्यात आले. अखेर आजोबा ठणठणीत झाल्याने ७ मे रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.एस.व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. कीर्ती तांदळे, डाॅ. अश्विन पाटील, आयसीयू इन्जार्ज सिस्टर जयश्री कुलकर्णी, रिता खलंग्रीकर, आशा शिरसाट, अनुजा सावरगावे, स्वाती कराळे, सीमा देशमुख, आशा क्षीरसागर,राजश्री सत्रे, फिजिओथेरपिस्ट प्राची काटे, एक्सरे टेक्निशियन अनिल वाहूळ, जीवन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

रुग्णाची सकारात्मकता महत्त्वाची

सध्या कोरोना झाला की एचआरसीटी स्कोअरची चिंता केली जाते. पण स्कोअरची चिंता करण्यापेक्षा वेळीच उपचार घेतला पाहिजे. आजार अंगावर काढला तरच स्कोअर वाढतो. हा स्कोअर वाढला तरी योग्य उपचाराने रुग्ण बरा होतो. पण उपचाराबरोबर रुग्णाची सकारात्मकताही महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या उपचारामुळेच आपण सुखरूप घरी जात असल्याचे सुभाष जाधव म्हणाले.

फोटो ओळ....

जिल्हा रुग्णालयात ७८ वर्षीय आजोबांना सुटी देताना उपस्थित डाॅक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी.