शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

५९६ कोटींच्या वसूलीचे शिखर कसे गाठणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोनामुळे महापालिका आर्थिक संकटातून जात आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टीतून चालू आर्थिक वर्षात ५९६ कोटी उद्दिष्ट आहे. ...

औरंगाबाद : कोरोनामुळे महापालिका आर्थिक संकटातून जात आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टीतून चालू आर्थिक वर्षात ५९६ कोटी उद्दिष्ट आहे. पहिल्या तीन महिन्यात फक्त ३६ कोटी वसुली झाली. वसुलीत पायथ्याशी रांगणारी मनपा मार्च २०२२ पर्यंत वसुलीचे शिखर कसे गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिक चालू आर्थिक वर्षाचा कर भरण्यास तयार नाहीत. मग थकबाकीचे ८७४ कोटी रुपये कसे भरतील, असा प्रश्नही प्रशासनाला भेडसावत आहे.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी अनेकदा महापालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली किमान ९० टक्के असावी, अशी सूचना केलेली आहे. मात्र, आजपर्यंत मनपाची वसुली २५ ते ३० टक्क्यांवर कधीच गेली नाही. दरवर्षी २५० ते ३५० कोटींची तूट सहन करावी लागते. नागरिक नियमित कर भरत नसल्याने मागील काही वर्षांपासून प्रशासनाने करवाढही केलेली नाही. दरवर्षी जुन्या दरानुसारच वसुली करण्यात येते. दरवर्षी मालमत्ता करावरील व्याज ७५ टक्के माफही केला जातो. त्यानंतरही मालमत्ताधारक थकबाकी, नियमित कर भरत नाहीत. कर भरला नाही तरी काहीच होत नाही, असा एक गैरसमज मालमत्ताधारकांमध्ये पसरला आहे. राज्यातील काही महापालिकांनी थकबाकी मोठी असल्यास थेट संबंधित मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची पद्धती स्वीकारली आहे. औरंगाबाद महापालिकाही यादृष्टीने पाऊल उचणार असल्याची चर्चा आहे.

४३८ कोटी- मालमत्ता कराचे यंदा उद्दिष्ट

१५८ कोटी- पाणीपट्टीचे यंदाचे उद्दिष्ट

एकूण- ५९६ कोटी उत्पन्न अपेक्षित

८७४ कोटींची एकूण थकबाकी

४८८ कोटी मूळ रक्कम

३८६ कोटी निव्वळ व्याज

१० लाखांपेक्षा अधिक थकबाकी

शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे १० लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे, त्यांना नोटिसा पाठविणे, कराचे टप्पे पाडून वसुली करणे आदी कामे वॉर्ड कार्यालयांकडून सध्या सुरू आहेत. मात्र, मालमत्ताधारक कोरोनामुळे अजिबात प्रतिसाद देत नाहीत. वसुली करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबवावी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

पाणीपट्टीत मोठी तूट

२०२१-२२ या आर्थिक वर्षात १५८ कोटी रुपये पाणीपट्टी वसूल झाली पाहिजे, असे मनपाला वाटते. जायकवाडीहून पाणी शहरात आणण्यासाठी दरमहा १० ते १२ कोटी रुपये खर्च करावे लागतात. १०० ते १२० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर निधी खर्च होतो. त्या तुलनेत पाणीपट्टी २५ ते ३० काेटी रुपये वसूल होते. शहरातील हजारो अनधिकृत नळ कनेक्शन याला जबाबदार आहेत.

कोरोनामुळे वसुलीत प्रचंड त्रास

कोरोनामुळे मागील वर्षीही मनपाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यंदाही परिस्थिती तशीच आहे. वॉर्ड कार्यालयांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरणा केंद्रांची वाढ केली. वर्ष अखेरीस मागील वर्षीच्या तुलनेत वसुली अधिक होईल, हे निश्चित.

अपर्णा थेटे, उपायुक्त, महापालिका.