शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

योजना राबविलेली गावे टंचाईत कशी?

By admin | Updated: April 29, 2015 00:54 IST

बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.

बीड : कोट्यावधी रूपये केवळ पाणी पुरवठा योजनावर खर्च करूनही प्रत्येक वर्षी तीच ती गावे टंचाईमध्ये येतातच कशी? असा सवाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव महेश सावंत यांनी उपस्थित केला.बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात सोमवारी पाणी टंचाई आडवा बैठक सावंत यांनी घेतली.याप्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कक्ष अधिकारी मुंबई राजेंद्र कुमठगी, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, ग्रामीण पुरवठा अधिकारी एस. व्ही. चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मागील तीन वर्षापासून जिल्हयात दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा झालेला आहे. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पाणी पुरवठ्याच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. तीच गावे पुन्हा २०१५ च्या दुष्काळी गावांमध्ये असल्याचे निदर्शनास आल्याने पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)