शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

शासनाच्या पैशांवर किती दिवस जगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:01 IST

प्रत्येक कामांसाठी शासनाच्या पैशांवरच का अवलंबून राहावे. आणखी किती दिवस मनपा अशा पद्धतीने जगणार आहे...? असा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी उपस्थित केला.

औरंगाबाद : रस्त्यांसाठी शासन अनुदान, भूमिगत गटार योजनेसाठी शासनाचे अनुदान, पाणीपुरवठ्यासाठी शासनाचा निधी, प्रत्येक कामांसाठी शासनाच्या पैशांवरच का अवलंबून राहावे. आणखी किती दिवस मनपा अशा पद्धतीने जगणार आहे...? असा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी उपस्थित केला. महापालिकेने आता तरी स्वत:चे आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या मयूरबन कॉलनी वॉर्डात पोदार स्कूल ते पृथ्वीराजनगर येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, मनपाने वसुली वाढवावी आणि शहरात विकासकामे करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, सभापती गजानन बारवाल, विकास जैन, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सिकंदर अली उपस्थित होते.तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या वॉर्डात मोंढानाका ते तानाजी चौक, गुरुद्वारा कमान आदी ठिकाणच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी संत एकनाथ रंगमंदिरासाठी २ कोटी रुपयांचे अनुदान डीपीडीसीमधून देण्याचे मान्य केले. बालाजीनगरचा पाणी प्रश्न किती दिवसांत सोडविणार, असा प्रश्न आयुक्तांना केला. आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मी आणले. भाजपचे महापौर त्याचे श्रेय घेत असतील तर घेऊ द्या. शेवटी पैसा शासनाचा आहे. ते श्रेयाचे होर्र्डिंग लावत असतील तर लावू द्या, काहीच हरकत नाही.