शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैल थडी कसी पावे सहजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:06 IST

निवडणुकांचा राष्ट्रीय शिमगा संपला; परंतु देशभर पेटलेल्या सरणांची होळी विझण्याची चिन्हे नाहीत. गेला महिनाभर देशभरात कोरोनाने हाहाकार उडविला, बेवारस ...

निवडणुकांचा राष्ट्रीय शिमगा संपला; परंतु देशभर पेटलेल्या सरणांची होळी विझण्याची चिन्हे नाहीत. गेला महिनाभर देशभरात कोरोनाने हाहाकार उडविला, बेवारस कुत्र्यासारखी माणसं मेली. ऑक्सिजनसाठी जीव गेले. रुग्णांच्या आप्तस्वकीयांचे प्राण कंठाशी आले तरी निवडणुकांच्या या उन्मादात देशभरातील हा विलाप सरकारच्या कानावर गेला नाही, कारण ‘दी ओ दी’च्या कर्णकर्कश आरोळ्यामुळे सरकारचे कान बधिर झाले होते. शेवटी न्यायसंस्थेला याबद्दल यंत्रणेला सज्जड दम देणारे इंजेक्शन टोचावे लागले; परंतु तोपर्यंत देशभरातील स्मशानं धडाडून पेटली होती. परिस्थिती हाताबाहेर गेली होती, सामान्य माणूस आणि यंत्रणा हे दोघेही हतबल झाले होते. या अवस्थेतून आजही हे दोघे सावरलेले नाहीत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. जगात कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण भारतात आहेत. लसीची टंचाई, औषधी आणि प्राणवायू यांचीही टंचाई, अपुरी वैद्यकीय व्यवस्था, मनुष्यबळ अशी सगळीकडूनच कोंडी झालेली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढते आहे. एका अर्थाने देशात आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती आहे. दुसरीकडे स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे परिस्थितीचा सामना कसा करावा याचे नियोजन नाही. पहिली लाट भारताने थोपविली ही फुशारकीसुद्धा फोल ठरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रसारमाध्यमांनी आपल्या व्यवस्थेचे जाहीर वाभाडे काढले, याचा परिणाम आमच्या महासत्तेकडे वाटचाल करणारा देश या प्रतिमेवर झाला आणि आपली रवानगी पुन्हा एकदा विकसनशील देशांच्या रांगेत झाली. निवडणूक हा साऱ्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. या एकाच राष्ट्रीय कार्यक्रमात भारतीय माणूस अगदी मनापासून सहभागी झालेला असतो. भलेही त्याचा त्या राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसला तरी मतप्रदर्शन, वादविवाद यात तो हिरीरीने भाग घेताना दिसतो. आत्ता परवाच्या पाचही राज्यांतील झालेल्या निवडणुकांशी इतर राज्यांतील लोकांचा थेट संबंध नव्हता. तरीही देशभर हा निवडणूक ज्वर पसरला होता. आपण इतके ढोंगी की, कोरोनाचे संकट समोर ढळढळीत दिसत असताना सर्वांनीच डोळ्यावर कातडे ओढून घेतले होते. निवडणुकांच्या हव्यासापोटी आपण कानाडोळा केला, त्याची जबर किंमत आता रोज मोजत आहोत. त्यावेळी एकाही पक्षाने अशा परिस्थितीत निवडणुका घेऊ नका हा आग्रह धरला नाही. कुंभमेळ्याला आक्षेप घेतला नाही. हे झाले राष्ट्रीय स्तरावरील चित्र. खाली जिल्हा आणि तालुका पातळीवरही तेथील नेते लॉकडाऊनला विरोध करीत होते, तर विरोधकांनी मोर्चे काढण्याची तयारी केली होती. परिस्थिती गंभीर बनल्यानंतर जनतेचे लॉकडाऊनसाठी मन वळवावे म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याचे उदाहरण नाही. अशावेळी त्यांचे मन वळविणे, प्रबोधन करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते, याचा सोयीस्कर विसर सर्वांनाच पडलेला आहे. आज संपूर्ण देश कडेलोटाच्या काठावर उभा आहे. हे संकट या देशाचे आहे. कोरोनाने केवळ आरोग्याचाच प्रश्न निर्माण केला नाही, तर परस्पर संबंधांचे ताणेबाणे सैल झाले आहेत. दीड वर्षापासूनच्या भीतीमुळे समाज ही भावना विसकळीत होऊन माणूस एकटा पडला. आर्थिक नुकसान ते वेगळेच. रोजगार बुडाले, उद्योग, व्यापाराची पीछेहाट झाली आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुतला. त्याही पेक्षा सर्वांचेच भावनिक नुकसान फार मोठे झाले. मुलांचे बालपण हरवले, तरुणांचे चैतन्य कोमेजले. याची किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे. समाजातील सर्वच वयोगटांवर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गंभीर परिणाम झाले असून, त्याचे दीर्घकालीन परिणाम समाजावर दिसून येतील. आता याची जबाबदारी फक्त सरकारवर टाकून चालणार नाही. परकीय आक्रमणांचा मुकाबला करण्यासाठी आपण वेळोवेळी एक राष्ट्र म्हणून उभे राहिलो होतो. गतकाळात अशी उदाहरणे असली तरी आज तशा एकजुटीची गरज आहे. विचार, जाती, पंथ हे सर्व भेदाभेद विसरून एक भारतीय म्हणून आपल्याला उभे राहायचे आहे. सरकारने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन संकट व्यवस्थापन म्हणून सर्व राजकीय पक्षांना सामावून घेऊन एक यंत्रणा उभी केली पाहिजे. एक भारत म्हणून आपण जगाला संकटाचा सामना करताना दिसलो पाहिजे, तरच यातून आपण वर उठू शकू. संत तुकाराम सांगून गेलेत...

फोडुनि सांगाडी बांधली माजासि

पैल थडी कसी पावे सहजे.