शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:03 IST

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना --- औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप ...

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना

---

औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप अभ्यास केला. तरी मित्र, मैत्रिणींपेक्षा तुलनेत कमी गुण मिळाले. अशा शंका, तक्रारी घेऊन पालक, विद्यार्थी विभागीय शिक्षण मंडळ गाठत आहेत. विद्यार्थी, पालकांचे शंकानिरसन बोर्डातील अधिकारी करत आहे. मूल्यांकन शाळांनी करून बोर्डाकडे दिले. त्यामुळे गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्याचे बोर्डाने निकालावेळी स्पष्ट केले होते. तरी, दुरुस्तीसाठी विनंत्या सुरूच आहेत.

दहावी आणि बारावीचा मूल्यांकनावर आधारित निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. त्यात पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली नाही; परंतु काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी ते नोंदवावेत, असे राज्य मंडळाने कळवले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाकडे २० पर्यंत तक्रारी आल्या. यात विद्यार्थी मित्र-मैत्रिणींत तुलना केली जात आहे. त्यानुसार गुण कमी असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन विभागीय शिक्षण मंडळ करत आहे.

----

विद्यार्थी ज्या शाळा, महाविद्यालयात शिकले. त्याच शाळांनी ठरवून दिलेल्या निकषांआधारे मूल्यांकन करून ते बोर्डाकडे ऑनलाइन भरले गेले. त्याआधारे बोर्डाने निकाल जाहीर केला. तरी तक्रारी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना गुण दाखवून त्या गुणांमध्ये शिक्षण मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे समुपदेशन करत आहोत.

- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद

---

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे ?

---

- नववीत मी त्याच्यापेक्षा हुशार होतो, दहावीत अभ्यास, ऑनलाइन क्लास, प्रात्यक्षिक केले. तरी त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे?

- दहावीत मला गुण चांगले होते. अकरावीतही जास्त गुण होते. तरी बारावीत कमी गुण कसे काय मिळाले?

- शाळा म्हणते बरोबर गुण दिले. बोर्डाकडून काही चूक झाली असेल. बोर्ड म्हणते आमचा काही हस्तक्षेप नाही. मी काय करू? असे प्रश्न विद्यार्थी पालक बोर्डाकडे करत आहेत.

--

ओळखीतल्या मुलांना शाळेकडून चांगले गुण दिले गेले. माझा मुलगा हुशार होता. त्याला कमी मार्क मिळाले. आता, दुरुस्तीची काही सोय नाही. काय करणार जाऊ द्या.

- संगीता बेराड, पालक

---

शाळेकडून मूल्यांकनातील तांत्रिक चुकांमुळे हुशार मित्रांना कमी गुण मिळाले. तर ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही. त्यांना जास्त गुण मिळाले. पण त्यांचा पाया कच्चा राहून त्यांचा अतिआत्मविश्वास वाढेल.

- प्रतीक सुरडकर, विद्यार्थी

----

मला पहिली ते नववी प्रत्येक वर्षी माझ्या मैत्रिणीपेक्षा अधिक गुण मिळत होते. यावर्षी मात्र, मैत्रिणीपेक्षा दहावीत कमी गुण मिळाले. पण, अकरावीचा प्रवेश मिळाला त्यामुळे चिंता नाही.

- ज्ञानेश्वरी पंडित, विद्यार्थिनी

---

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६५,७४०

दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी - ६५,१५४

बारावीतील एकूण विद्यार्थी -५३,४४७

बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी -५३,१९६