शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:03 IST

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना --- औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप ...

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना

---

औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप अभ्यास केला. तरी मित्र, मैत्रिणींपेक्षा तुलनेत कमी गुण मिळाले. अशा शंका, तक्रारी घेऊन पालक, विद्यार्थी विभागीय शिक्षण मंडळ गाठत आहेत. विद्यार्थी, पालकांचे शंकानिरसन बोर्डातील अधिकारी करत आहे. मूल्यांकन शाळांनी करून बोर्डाकडे दिले. त्यामुळे गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्याचे बोर्डाने निकालावेळी स्पष्ट केले होते. तरी, दुरुस्तीसाठी विनंत्या सुरूच आहेत.

दहावी आणि बारावीचा मूल्यांकनावर आधारित निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. त्यात पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली नाही; परंतु काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी ते नोंदवावेत, असे राज्य मंडळाने कळवले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाकडे २० पर्यंत तक्रारी आल्या. यात विद्यार्थी मित्र-मैत्रिणींत तुलना केली जात आहे. त्यानुसार गुण कमी असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन विभागीय शिक्षण मंडळ करत आहे.

----

विद्यार्थी ज्या शाळा, महाविद्यालयात शिकले. त्याच शाळांनी ठरवून दिलेल्या निकषांआधारे मूल्यांकन करून ते बोर्डाकडे ऑनलाइन भरले गेले. त्याआधारे बोर्डाने निकाल जाहीर केला. तरी तक्रारी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना गुण दाखवून त्या गुणांमध्ये शिक्षण मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे समुपदेशन करत आहोत.

- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद

---

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे ?

---

- नववीत मी त्याच्यापेक्षा हुशार होतो, दहावीत अभ्यास, ऑनलाइन क्लास, प्रात्यक्षिक केले. तरी त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे?

- दहावीत मला गुण चांगले होते. अकरावीतही जास्त गुण होते. तरी बारावीत कमी गुण कसे काय मिळाले?

- शाळा म्हणते बरोबर गुण दिले. बोर्डाकडून काही चूक झाली असेल. बोर्ड म्हणते आमचा काही हस्तक्षेप नाही. मी काय करू? असे प्रश्न विद्यार्थी पालक बोर्डाकडे करत आहेत.

--

ओळखीतल्या मुलांना शाळेकडून चांगले गुण दिले गेले. माझा मुलगा हुशार होता. त्याला कमी मार्क मिळाले. आता, दुरुस्तीची काही सोय नाही. काय करणार जाऊ द्या.

- संगीता बेराड, पालक

---

शाळेकडून मूल्यांकनातील तांत्रिक चुकांमुळे हुशार मित्रांना कमी गुण मिळाले. तर ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही. त्यांना जास्त गुण मिळाले. पण त्यांचा पाया कच्चा राहून त्यांचा अतिआत्मविश्वास वाढेल.

- प्रतीक सुरडकर, विद्यार्थी

----

मला पहिली ते नववी प्रत्येक वर्षी माझ्या मैत्रिणीपेक्षा अधिक गुण मिळत होते. यावर्षी मात्र, मैत्रिणीपेक्षा दहावीत कमी गुण मिळाले. पण, अकरावीचा प्रवेश मिळाला त्यामुळे चिंता नाही.

- ज्ञानेश्वरी पंडित, विद्यार्थिनी

---

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६५,७४०

दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी - ६५,१५४

बारावीतील एकूण विद्यार्थी -५३,४४७

बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी -५३,१९६