शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:03 IST

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना --- औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप ...

मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना

---

औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप अभ्यास केला. तरी मित्र, मैत्रिणींपेक्षा तुलनेत कमी गुण मिळाले. अशा शंका, तक्रारी घेऊन पालक, विद्यार्थी विभागीय शिक्षण मंडळ गाठत आहेत. विद्यार्थी, पालकांचे शंकानिरसन बोर्डातील अधिकारी करत आहे. मूल्यांकन शाळांनी करून बोर्डाकडे दिले. त्यामुळे गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्याचे बोर्डाने निकालावेळी स्पष्ट केले होते. तरी, दुरुस्तीसाठी विनंत्या सुरूच आहेत.

दहावी आणि बारावीचा मूल्यांकनावर आधारित निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. त्यात पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली नाही; परंतु काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी ते नोंदवावेत, असे राज्य मंडळाने कळवले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाकडे २० पर्यंत तक्रारी आल्या. यात विद्यार्थी मित्र-मैत्रिणींत तुलना केली जात आहे. त्यानुसार गुण कमी असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन विभागीय शिक्षण मंडळ करत आहे.

----

विद्यार्थी ज्या शाळा, महाविद्यालयात शिकले. त्याच शाळांनी ठरवून दिलेल्या निकषांआधारे मूल्यांकन करून ते बोर्डाकडे ऑनलाइन भरले गेले. त्याआधारे बोर्डाने निकाल जाहीर केला. तरी तक्रारी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना गुण दाखवून त्या गुणांमध्ये शिक्षण मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे समुपदेशन करत आहोत.

- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद

---

मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे ?

---

- नववीत मी त्याच्यापेक्षा हुशार होतो, दहावीत अभ्यास, ऑनलाइन क्लास, प्रात्यक्षिक केले. तरी त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे?

- दहावीत मला गुण चांगले होते. अकरावीतही जास्त गुण होते. तरी बारावीत कमी गुण कसे काय मिळाले?

- शाळा म्हणते बरोबर गुण दिले. बोर्डाकडून काही चूक झाली असेल. बोर्ड म्हणते आमचा काही हस्तक्षेप नाही. मी काय करू? असे प्रश्न विद्यार्थी पालक बोर्डाकडे करत आहेत.

--

ओळखीतल्या मुलांना शाळेकडून चांगले गुण दिले गेले. माझा मुलगा हुशार होता. त्याला कमी मार्क मिळाले. आता, दुरुस्तीची काही सोय नाही. काय करणार जाऊ द्या.

- संगीता बेराड, पालक

---

शाळेकडून मूल्यांकनातील तांत्रिक चुकांमुळे हुशार मित्रांना कमी गुण मिळाले. तर ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही. त्यांना जास्त गुण मिळाले. पण त्यांचा पाया कच्चा राहून त्यांचा अतिआत्मविश्वास वाढेल.

- प्रतीक सुरडकर, विद्यार्थी

----

मला पहिली ते नववी प्रत्येक वर्षी माझ्या मैत्रिणीपेक्षा अधिक गुण मिळत होते. यावर्षी मात्र, मैत्रिणीपेक्षा दहावीत कमी गुण मिळाले. पण, अकरावीचा प्रवेश मिळाला त्यामुळे चिंता नाही.

- ज्ञानेश्वरी पंडित, विद्यार्थिनी

---

दहावीतील एकूण विद्यार्थी - ६५,७४०

दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी - ६५,१५४

बारावीतील एकूण विद्यार्थी -५३,४४७

बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी -५३,१९६