शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘आवास’ योजनेचा बट्ट्याबोळ !

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

बालाजी बिराजदार, लोहारा कच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली

बालाजी बिराजदार, लोहाराकच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली. परंतु, लोहारा तालुक्यात या योजनेचा पुरता बट्ट्याबोळा झाला आहे. २०१०-२०११ आणि २०११-२०१२ या दोन वर्षामध्ये १७१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ४४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे. या प्रकाराबाबत लाभार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षामध्ये लोहारा तालुक्यातील १९ लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुले मंजूर झाली होती. घरकुलांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधित यंत्रणा ७ घरकुलांचेच काम पूर्ण करू शकली. उर्वरित १२ लाभार्थ्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे घर मिळू शकले नाही. त्यानंतर २०११-२०१२ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तावांची संख्या वाढली. त्यानुसार मंजूर घरकुलांची संख्याही १५२ वर जाऊन ठेपली. परंतु, पूर्ण घरकुलांचा आकडा ३७ च्या पुढे नेता आला नाही. प्रशासनाच्या दप्तरी २३ घरकुले अद्याप अपूर्ण आहेत. ९२ घरकुलांचा श्रीगणेशाही केलेला नाही. प्रशासनाच्या दप्तरी ७० घरकुले स्थगित करण्यात आले, असे नमूद करण्यात आले आहे. तर २२ घरकुलांच्या जागेला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, २०१३-२०१४ या वर्षामध्येही आलेले ४० प्रस्ताव प्राप्त वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. परंतु, या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. (वार्ताहर)कामे पूर्ण करून घेण्याकडे कानाडोळासर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी मागील दोन वर्षात १७१ प्रस्तावांना मंजुरी दिली. परंतु, घरकुलांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे आजवर केवळ ४४ लाभार्थ्यांनाच त्यांच्या हक्काचे घरकुल मिळू शकले. काहींना जागा मिळाली नाही. तर उर्वरित अपूर्ण आहेत. मागील दोन वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. त्यामुळे ही घरकुले पूर्ण होणार तरी कधी? असा सवाल आता लाभार्थ्यांतूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे.१३ लाभार्थ्यांना नोटीस२०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील १०२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. वर्ष सरून काही महिने लोटले असतानाही यापैकी १३ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. अशा लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नसल्याने काही घरकुले स्थगित आहेत. जागा अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यास त्या प्रस्तावांचा फेरविचार होऊ शकतो, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.