शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

‘आवास’ योजनेचा बट्ट्याबोळ !

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

बालाजी बिराजदार, लोहारा कच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली

बालाजी बिराजदार, लोहाराकच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली. परंतु, लोहारा तालुक्यात या योजनेचा पुरता बट्ट्याबोळा झाला आहे. २०१०-२०११ आणि २०११-२०१२ या दोन वर्षामध्ये १७१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ४४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे. या प्रकाराबाबत लाभार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षामध्ये लोहारा तालुक्यातील १९ लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुले मंजूर झाली होती. घरकुलांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधित यंत्रणा ७ घरकुलांचेच काम पूर्ण करू शकली. उर्वरित १२ लाभार्थ्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे घर मिळू शकले नाही. त्यानंतर २०११-२०१२ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तावांची संख्या वाढली. त्यानुसार मंजूर घरकुलांची संख्याही १५२ वर जाऊन ठेपली. परंतु, पूर्ण घरकुलांचा आकडा ३७ च्या पुढे नेता आला नाही. प्रशासनाच्या दप्तरी २३ घरकुले अद्याप अपूर्ण आहेत. ९२ घरकुलांचा श्रीगणेशाही केलेला नाही. प्रशासनाच्या दप्तरी ७० घरकुले स्थगित करण्यात आले, असे नमूद करण्यात आले आहे. तर २२ घरकुलांच्या जागेला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, २०१३-२०१४ या वर्षामध्येही आलेले ४० प्रस्ताव प्राप्त वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. परंतु, या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. (वार्ताहर)कामे पूर्ण करून घेण्याकडे कानाडोळासर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी मागील दोन वर्षात १७१ प्रस्तावांना मंजुरी दिली. परंतु, घरकुलांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे आजवर केवळ ४४ लाभार्थ्यांनाच त्यांच्या हक्काचे घरकुल मिळू शकले. काहींना जागा मिळाली नाही. तर उर्वरित अपूर्ण आहेत. मागील दोन वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. त्यामुळे ही घरकुले पूर्ण होणार तरी कधी? असा सवाल आता लाभार्थ्यांतूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे.१३ लाभार्थ्यांना नोटीस२०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील १०२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. वर्ष सरून काही महिने लोटले असतानाही यापैकी १३ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. अशा लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नसल्याने काही घरकुले स्थगित आहेत. जागा अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यास त्या प्रस्तावांचा फेरविचार होऊ शकतो, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.