शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

‘आवास’ योजनेचा बट्ट्याबोळ !

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

बालाजी बिराजदार, लोहारा कच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली

बालाजी बिराजदार, लोहाराकच्च्या घरामध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी रमाई आवास योजना सुरू करण्यात आली. परंतु, लोहारा तालुक्यात या योजनेचा पुरता बट्ट्याबोळा झाला आहे. २०१०-२०११ आणि २०११-२०१२ या दोन वर्षामध्ये १७१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ४४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहे. या प्रकाराबाबत लाभार्थ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षामध्ये लोहारा तालुक्यातील १९ लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुले मंजूर झाली होती. घरकुलांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधित यंत्रणा ७ घरकुलांचेच काम पूर्ण करू शकली. उर्वरित १२ लाभार्थ्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे घर मिळू शकले नाही. त्यानंतर २०११-२०१२ या आर्थिक वर्षामध्ये प्रस्तावांची संख्या वाढली. त्यानुसार मंजूर घरकुलांची संख्याही १५२ वर जाऊन ठेपली. परंतु, पूर्ण घरकुलांचा आकडा ३७ च्या पुढे नेता आला नाही. प्रशासनाच्या दप्तरी २३ घरकुले अद्याप अपूर्ण आहेत. ९२ घरकुलांचा श्रीगणेशाही केलेला नाही. प्रशासनाच्या दप्तरी ७० घरकुले स्थगित करण्यात आले, असे नमूद करण्यात आले आहे. तर २२ घरकुलांच्या जागेला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, २०१३-२०१४ या वर्षामध्येही आलेले ४० प्रस्ताव प्राप्त वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. परंतु, या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. (वार्ताहर)कामे पूर्ण करून घेण्याकडे कानाडोळासर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी मागील दोन वर्षात १७१ प्रस्तावांना मंजुरी दिली. परंतु, घरकुलांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे आजवर केवळ ४४ लाभार्थ्यांनाच त्यांच्या हक्काचे घरकुल मिळू शकले. काहींना जागा मिळाली नाही. तर उर्वरित अपूर्ण आहेत. मागील दोन वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. त्यामुळे ही घरकुले पूर्ण होणार तरी कधी? असा सवाल आता लाभार्थ्यांतूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे.१३ लाभार्थ्यांना नोटीस२०१३-२०१४ या आर्थिक वर्षामध्ये इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील १०२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. वर्ष सरून काही महिने लोटले असतानाही यापैकी १३ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. अशा लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नसल्याने काही घरकुले स्थगित आहेत. जागा अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यास त्या प्रस्तावांचा फेरविचार होऊ शकतो, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.