शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

सातारा देवळाईतील घरे टुमदार, पण पाहुण्यांना प्यायला द्यायला पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:05 IST

मनपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही शहराचा दक्षिण भाग झपाट्याने टोलेजंग इमारतीच्या रूपाने उभा राहतो आहे. ग्रामपंचायतीच्या काळात जानेवारीपासूनच या भागात ...

मनपाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही शहराचा दक्षिण भाग झपाट्याने टोलेजंग इमारतीच्या रूपाने उभा राहतो आहे. ग्रामपंचायतीच्या काळात जानेवारीपासूनच या भागात पाण्यासाठी सातारा-देवळाई दोन्ही ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी लागत होती. सातारा- देवळाईतील नागरिकांना दरवर्षी फक्त पाण्यावरच जास्तीचा खर्च करावा लागत होता. आता मनपात दाखल होऊन एक पंचवार्षिक उलटले. पण नागरिकांच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही.

शासनाच्या तिजोरीतून शहरासाठी होऊ घातलेल्या पाणीपुरवठा योजनेत या परिसराचा समावेश करण्यात आला आहे; परंतु त्याकामाला सुरूवात केव्हा होणार याची सातारा-देवळाईकरांना काडीमात्र खबर नाही. सातारा वॉर्ड कार्यालयात जावून नागरिकांना पाण्यासाठी बाराही महिने आगाऊ पैसे भरावे लागतात किंवा खासगी टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.

विरळ वसाहती झाल्या दाट...

सातारा-देवळाईत विरळ वसाहती होत्या. आता घनदाट होऊन पाऊण लाखाच्यावर लोकसंख्या पोहोचली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या टोलेजंग सदनिकांमुळे परिसर शोभून दिसतो आहे. परंतु जलवाहिनीची सोय कुणीच केलेली नाही. नुकतेच रस्ते बऱ्यापैकी झालेले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

- रोहन पवार (सातारा परिसर)

बजेट बिघडलेले आहे...

लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे घराचे हप्ते थकले. अनेकांचे भाडेकरू गावाकडे गेल्याने मोठी पंचायत झाली. त्यातही विकतचे पाणी घेऊन तहान भागविताना जीव मेटाकुटीला आला. कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना त्वरित राबवावी.

- बद्रिनाथ थोरात (शिक्षक)