शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एन-४ मधील घरे रस्त्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : हनुमान चौक ते एन-४ मार्गे उच्च न्यायालयाकडे जाणारा रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाल्यामुळे नागरिकांची घरे ...

औरंगाबाद : हनुमान चौक ते एन-४ मार्गे उच्च न्यायालयाकडे जाणारा रस्ता दोन ते अडीच फूट उंच झाल्यामुळे नागरिकांची घरे खाली गेली आहेत. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे अनेक घरांच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचले. सध्या साईडड्रेन आणि पेव्हिंग ब्लॉक टाकण्याचे काम सुरू असले तरी, पावसाचे पाणी बाहेर कसे जाणार असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

कार्यालयासमोर रस्त्याचे काम ठप्प

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. त्यामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असून किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

‘ग्रामविकास’च्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

औरंगाबाद : ग्रामविकास संस्थेच्या जलविषयक दोन पुस्तकांचे प्रकाशन आदर्श गाव संकल्प व प्रकल्पचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याहस्ते केले. ‘सर्वांसाठी पाणी; वेध पाणी प्रश्नांचा’ या नरहरी शिवपुरे लिखित आणि ‘चित्तेनदी पुनरुज्जीवन अभियान एक शोधयात्रा’ या संतोष लेंभे लिखित पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ‘वाल्मी’चे माजी संचालक सु. भि. वराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे यांची उपस्थिती होती.

दुभाजकांमधील वृक्ष वाळले

औरंगाबाद : शहरातील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी वाळले आहेत. मागील दोन महिन्यांत पालिकेच्या यंत्रणेने दुभाजकातील झाडांना पाणी न दिल्यामुळे ती वाळली आहेत. विकास आराखड्यातील प्रत्येक रस्त्यावरील दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले आहे.

...तर मनसे न्याय मिळवून देईल

औरंगाबाद : प्रशासनातील सर्व यंत्रणांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत. आता रुग्णसंख्या कमी होत असताना प्रशासनाने व्यापाऱ्यांची दुकाने सील करू नयेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नयेत. व्यापारी, दुकानदारांच्या अडचणी प्रशासनाने समजून घ्याव्यात, अन्यथा मनसे न्याय मिळवून देईल, असे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनाम गुलाटी यांनी कळविले आहे.

मधला मार्ग खुला करण्याची मागणी

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातून अप्पर तहसील आणि ग्रामीण तहसीलकडे जाणारा मधला मार्ग प्रशासनाने बंद केला आहे. सदरील मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मार्ग बंद असल्याने लांबून नागरिकांना कार्यालयाकडे जावे लागत आहे.

लॉकडाऊनमुळे कुलर्स दुरुस्ती केली नाही

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी लॉकडाऊनमुळे नगण्य आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेले वॉटरकुलर प्रशासनाने दुरुस्त केले नाहीत. लॉकडाऊननंतर ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न होतील, असे सूत्रांनी सांगितले.

भूसंपादनास विलंब

औरंगाबाद : विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी सक्षम अधिकारी नेमण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. भूसंपादनासाठी तालुका भूमिअभिलेखने मोजणी केली. मात्र सक्षम अधिकारी नियुक्ती रखडल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होतो आहे.

१४६० रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन रुग्णालय आणि घाटी रुग्णालयामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. २४ मेपर्यंत खासगी रुग्णालयांना १४६० रेमडेसिविर इंजेक्शन्सचा पुरवठा करण्यात आला. खासगी रुग्णालयांना मागणीप्रमाणे इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.