शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

तासाभराचा विलंब ठरू शकतो जीवघेणा

By admin | Updated: September 23, 2014 23:22 IST

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे.

हिंगोली : गतिमान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची निष्काळजी हृदयरोगाकडे घेऊन जात आहे. परिणामी, मागील चार वर्षांत ग्रामीण भागात दुपटीने तर शहरी भागात सहा पटीने रूग्ण वाढले. विशेषत: लक्षणाविना अचानक आणि अनपेक्षितपणे आलेल्या झटक्यानंतरच हा आजार उद्भवल्याचे समजते. तद्नंतर तासाभरात जर रुग्णालय जवळ केले नाही तर प्राणास मुकावे लागते. आरोग्याच्या समस्येविना माणूस सापडणे दुर्मिळच. दिवसेंदिवस नवनवे आजार समोर येताना दिसतात. गंभीर आणि दुर्धर आजारांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली. काही आजार सांगून येतात तर काही आजारांना स्वत:हून आमंत्रण देतो. दोन्हीपेक्षा वेगळा असलेल्या हृदयरोगाचे वैैशिष्ट हे अनपेक्षितपणा आहे; परंतु त्यासाठी मानवाची बदलती जीवनशैैली कारणीभूत ठरते. दिनक्रमातील गतिमानता काहीअंशी या आजाराकडे घेऊन जाते. त्याहीपेक्षा तानतणावाचा परिणाम आजारांना निमंत्रण देणारा ठरतो. तत्क्षणी आरोग्याचा निष्काळजीपणा अधिक भोवण्याची शक्याता असते. प्रामुख्याने हृदयास होणाऱ्या अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे तो उद्भवतो. हृदयातील रक्तवाहिन्यांत चरबीचा साठा होऊन त्याची पोकळी निर्माण होते. परिणामी, रक्तपुरवठा बंद पडल्याने झटका यतो. पुरूषांमध्ये ४५ तर स्त्रियांमध्ये ५५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्तांनी अधिक धोका संभवतो. आजघडीला या आजारालाही वय राहिले नाही. घरातील व्यक्तींना व जवळच्या नातेवाईकांना जर हृदयरोग असेल तर घरातील कोणालाही हा आजार होऊ शकतो. अचानक छातीत वेदना होतात. तत्क्षणी रूग्णास चालवू नये आणि तातडीने दवाखाना जवळ करावा. हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात या रूग्णांसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वतंत्र विभाग तर लांबचीच बाब आहे. परिणामी, खाजगी रूग्णालयात का होईना तासाच्या आत रूग्णांना घेऊन जाणे अगत्याचे ठरते. अन्यथा अधिक विलंब रूग्णांचे प्राण घेऊ शकतो. हे आहेत उपायहा आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करावा, रक्ताची तपासणी करावी, चाळीसीनंतर वर्षातून एकदा ईसीजी काढून खात्री करावी. उपचार घेणाऱ्या रूग्णांनी दररोज तासभर चालावे, फास्टफूड, मांस, तेलकट पदार्थ खाऊ नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचा असल्ला डॉ. अगस्ती जवळेकर यांनी दिला. (वार्ताहर)