शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

घाटीतील इंटर्न डाॅक्टरांच्या वसतिगृह बनले समस्यांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:05 IST

अस्मीचे अधिष्ठातांना निवेदन :२० दिवसांपासून पाणीटंचाई औरंगाबाद ः गेल्या २० दिवसांपासून कोणत्याही वापरासाठी वसतिगृहात पाणी नाही. साफसफाईकडे दुर्लक्ष होत ...

अस्मीचे अधिष्ठातांना निवेदन :२० दिवसांपासून पाणीटंचाई

औरंगाबाद ः गेल्या २० दिवसांपासून कोणत्याही वापरासाठी वसतिगृहात पाणी नाही. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. कॅन्टीनचे अवाढव्य दर खिशाला कात्री लावत आहे. खोल्या, खिडक्या, दरवाजे दुरुस्तीअभावी निकामी झाले आहेत. तर टेबल खुर्ची पलंग गाद्यांची सुरुवातीपासून वानवा आहे. कुत्र्यांचा वावर वाढला असून, जिमखान्यात यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी इंटर्न डाॅक्टरांच्या संघटनेने घाटीच्या अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अस्मीने दिलेल्या निवेदनात, आजवर शेकडो अर्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देऊन झाले आहेत, महाविद्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवते तर सार्वजनिक बांधकाम विभाग महाविद्यालयाकडे यात शेवटी इंटर्न डाॅक्टरांच्या हातात काहीच लागत नाही. यूजी होस्टेल राहण्यायोग्य करून मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास इंटर्न आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.