शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आनंदीबाई जोशी पुरस्काराने रुग्णालयांचा गौरव

By admin | Updated: March 25, 2017 22:55 IST

उस्मानाबाद : राज्य शासनाच्या वतीने देशाच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माता बाल संगोपन व उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल आरोग्य केंद्रांचा सन्मान करण्यात येतो़

उस्मानाबाद : राज्य शासनाच्या वतीने देशाच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माता बाल संगोपन व उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल आरोग्य केंद्रांचा सन्मान करण्यात येतो़ या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व तीन उपकेंद्रांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले़ याशिवाय सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार, कायाकल्प पुरस्काराचे वितरण करून आशा कार्यकर्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला़जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी जि़प़अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमास उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़व्ही़वडगावे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम आलेल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयासह माणकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र, येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र, दुधोडी उपकेंद्र, मस्सा (खं़) उपकेंद्र, चिंचोली (ज़) उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला़ यावेळी उत्कृष्ठ आशा स्वयंसेविका पुरस्कारात कालिंदा धनंजय कदम यांना प्रथम तर विजया लक्ष्मण रोडगे यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला़ तालुकास्तरीय आशा पुरस्कार व नाविन्यपूर्ण पुरस्कार मंगल प्रताप वाडीकर, जिजाबाई नाना शिरसाठे यांना प्रदान करण्यात आला़ गटप्रवर्तक पुरस्कार शाहीन ईलाही शेख यांना प्रथम, प्रमिला हरिश्चंद्र पवार यांना द्वितीय, श्रीदेवी मारुती चौरे यांना तृतीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कायाकल्प कार्यक्रमांतर्गत आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम तर वालवड व पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्रास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले़ राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला़ यावेळी सहा जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. फुलारी, अति. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ, सांख्यिकी अधिकारी कवितके, तालुका आरोग्य अधिकारी ए़यू़लाकाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले तर डॉ. के. के. मिटकरी यांनी उपस्थितांचे मानले.