शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बागायती शेतीची नोंद कोरडवाहू; निषेधार्थ धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:30 IST

समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गात संपादित करण्यात येणा-या बागायती शेतीची नोंद सर्वेक्षणामध्ये कोरडवाहू करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले व नंतर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गासाठी वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेतजमिनी संपादित करण्यात येत असून, त्यासाठी केल्या जाणा-या सर्वेक्षणात ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, अशा शेतीची नोंद केवळ तीन वर्षांचा पेरा नाही या कारणास्तव कोरडवाहू अशी करण्यात येत आहे.ही बाब अन्यायकारक आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी बागायती शेती करू शकले नाहीत; परंतु त्या बागायती आहेतच. विहीर, पाइपलाइन यासाठी या शेतक-यांनी कर्जसुद्धा घेतलेले आहे.सलग तीन वर्षे बागायती केलेली असणे हा निकष न ठेवता वस्तुस्थितीवर आधारित ज्या शेतक-यांकडे विहीर, बोअर, पाइपलाइन आहे, त्या बाबींची नोंद घेऊन या शेतीची बागायती अशी नोंद घेण्यात आली पाहिजे.या धरणे आंदोलनात घोडेगाव, गोळवाडी, दहेगाव, पालखेड, जांबरगाव या गावचे शेतकरी सहभागी झाले होते.विलास चव्हाण, शैलेश सुरासे, मयूर वेरुळकर, भाऊसाहेब राऊत, श्रीराम साळुंके, भाऊसाहेब शिंदे, आबासाहेब उगले, संताराम उगले, नानासाहेब रोठे, अद्दूसेठ बागवान, अण्णा उगले, नारायण उगले, कृष्णा पवार, दत्तात्रय पवार, पारसनाथ कोल्हे, नंदकुमार जाधव, योगेश उगले, सीताराम उगले, राजू शेळके, मधुकर सदावर्ते, नामदेव गवळी, शेख अल्ताफ, अब्दुल लतीफ, अश्फाक अहमद बागवान आदींसह कार्यकर्ते धरणे आंदोलनात उतरले होते.