शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
3
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
4
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
5
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
6
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
7
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
8
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
9
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
10
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
11
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
12
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
13
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
14
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
15
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
16
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
17
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
18
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
19
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक

२०० हेक्टर्सवरील पिके आडवी

By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़

डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़ विशेषत: नदीकाठच्या २०० हेक्टर्स क्षेत्रावरील पिके आडवी झाली आहे़ शिवाय, २० पेक्षा अधिक विहिरी गाळाने बुजल्या आहेत़ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीही पाण्याखाली गेल्या़ मात्र अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले नाहीत़ उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसराला शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपले होते़ या पावसामुळे गावाशेजारुन वाहणाऱ्या तिरु नदीला मागच्या १४ वर्षांत कधी नव्हे तो इतका पूर आला़ नदीचे पाणी गावातील घरांघरांमध्ये शिरुन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले़ काही घरांची पडझडही झाली़ गावातील नुकसानी प्रमाणेच नदीकाठच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले़ शेतात पाणी शिरल्याने पिके आडवी झाली़ हाळी हंडरगुळीसह परिसरातील शेळगाव, वडगाव, सुकणी, चिमाचीवाडी, मोर्तळवाडी, आनंदवाडी व इतरही काही शिवारातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ साधारणत: २०० हेक्टर्सवरील सोयाबीन, ज्वारी, तूर, केळीचे नुकसान झाले़ अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे़ केवळ पिकाचेच नव्हे तर विहिरींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ नदीकाठच्या जवळपास २० पेक्षा अधिक विहिरी गाळात बुडून गेल्या आहेत़ तिरु नदी व प्रकल्पावर शेतकऱ्यांनी जोडलेल्या जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत मोटारीही पाण्याखाली गायब झाल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे़ ज्याप्रमाणे गावातील पडझड, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात आले त्याप्रमाणे शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी शेतकरी सुनील कुंटे, खाजा तांबोळी, विकास जाधव, सतीश काळे, भाऊराव मुत्तलवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे़ अतिवृष्टीने हाळी हंडरगुळी परिसरातील व तिरु नदीशेजारील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबत उपविभागीय अधिकारी विकास खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला असल्याचे सांगितले़ कृषी विभागाकडून शेतीच्या नुकसानीबाबतची प्राथमिक माहिती या अहवालात आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच नुकसानीचे पंचनामे होतील, अशी माहितीही खरात यांनी दिली़