शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST

जालना: जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

जालना: जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्य परिसरात पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे. तर अद्याप काही भागात पाऊस झालेला नसल्याने अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जालना जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी सरासरी ३२ मि. मी. पाऊस झालेला आहे. ८ जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडीवारीनुसार जालना ८.३२ मि. मी., भोकरदन-०००, जाफराबाद-०००, बदनापूर- ३.४० मि. मी., परतूर १६ मि. मी., मंठा-४ मि. मी. घनसावंगी ५ मि. मी., अंबड- ७ मि. मी. पावसाची नोंद आहे. ८ जुलैरोजी सर्वाधिक पाऊस परतूर तालुक्यात पडला. आता पर्यंत सार्वाधिक पाऊस घनसावंगी तालुक्यात ४० मि.मी. पडल्याची नोंद आहे. सर्वात कमी बदनापूर तालुक्यात सरासरी १६ मि. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर पाऊस झालेल्या नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांंची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)परतूर : तालुक्यात महिनाभरापासून पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र दि. ८ रोजी पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी पावसाचा पत्ता नव्हता पेरण्या खोळंबण्याबरोबरच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी हवालदिल होते. परंतु दि. ८ रोजी व यापूर्वी काही गावात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी कपाशी लागवड, सोयाबीनच्या पेरणीबरोबरच इतर खरिपाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. जमिनीतील ओल व पावसाही वातावरणााने शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. (वार्ताहर)वरूड: जाफराबाद तालुक्यातील वरूड बू. परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा लागून महिना उलटला तरी अद्याप या भागात पाऊस झाला नसल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. मागील आठ दहा दिवसांपासून आभाळात ढग दाटून येते. पाऊस येईल असे वातावण निर्माण होते. मात्र पाऊस काही येत नाही. मृग व आर्द्रा नक्षत्र पावसासाठी नावाजले जातात. मात्र हे दोन्ही नक्षत्र कोरडे गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून ठिबकवर कपासीचे पीक घेतले. मात्र आता विहीरीतील पाणी कमी होत असल्याने ही कपाशीही धोक्यात आली आहे. रविवार पासून लागलेल्या पूर्नवसू नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. मात्र हे नक्षत्र लागून दोन दिवस झाले तरी अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.केदारखेडा : परिसरात दोन दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी पेरणीसह शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी व सोमवार दोन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामास लागला आहे. पावसाळा लागूनही एकही थेंब न पडल्याने शेतकरी धास्तावले होते. पेरणी पूर्व मशागत करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला होता़ रविवारी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केली. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. गतवर्षी १० जुलै अखेर खरीप पिकांची वाढ जोमात होती. यंदा अद्यापही अनेक भागात पेरणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही मोठा पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)दानापूरभोकरदन तालुक्यातील दानापूर येथून जवळच असलेले देहेड येथील शेतकरी सांडू बावस्कर यांनी एक हेक्टर क्षेत्रात कपाशी मध्ये ठिबक सिंचनाद्वारे अंतर पीक म्हणून मेथीची लागवड केली आहे. बावस्कर यांनी पारंपरिक पीक सांभाळून हा जोड व्यवसाय सुरु केला आहे. यामुळे चारपैसेही त्यांना मिळाल्याचे ते सांगतात. महिनाभरात मेथीची भाजी बाजारात विकली जाते. तुषार सिंचनाद्वारे कपाशीलाही या पाण्याचा फायदा होतो आणि मेथीच्या भाजीचे उत्पन्नही वाढत आहे.मागील वर्षीपासून दानापूर येथील शिवाजी महाराज, रामू आगलावे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कपाशीमध्ये अंतर पीक म्हणून मेथीची लागवड केली आहे. अल्पावधीतच मेथीला चांगली मागणी आल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.