शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला, पण तोही फेल गेला...

By admin | Updated: January 9, 2015 00:51 IST

औसा : पाऊस नसल्यामुळे शेतात पिकलं नाही. हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. मात्र तोही फेल गेला. संसाराचा गाडा चालवायचा कसा अन् मुला-बाळांचं शिक्षण करायचं कसं?

औसा : पाऊस नसल्यामुळे शेतात पिकलं नाही. हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. मात्र तोही फेल गेला. संसाराचा गाडा चालवायचा कसा अन् मुला-बाळांचं शिक्षण करायचं कसं? या विवंचनेत औसा तालुक्यातील लोदगा येथील तरुण शेतकरी प्रभाकर रघुनाथ भारती यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील रघुनाथ भारती यांच्या नावावर ६ एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांचे वय झाले असून, प्रभाकर भारती हे शेती पहायचे. शेतात काहीच पिकलं नसल्यामुळे मजूरी करायची. गेल्यावर्षी उसने पैसे घेऊन शेतात बोअर पाडला. मात्र हा बोअरही फेल गेला. यंदा निसर्गानेही दगा दिला. त्यामुळे हातउसने घेतलेले पैसे व वडिलांच्या नावावर असलेले सोसायटीचे १५ हजारांचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत प्रभाकर भारती होते. त्यांना दोन मुले. मुलगी सातवीला तर मुलगा दहावीला. त्यांच्या शिक्षणाचाही खर्च भागवायचा कसा? वृद्ध आई-वडिलांची जबाबदारीही त्यांच्यावरच. अशा परिस्थितीत निसर्गाने दगा दिला. त्यामुळे शेतात काही पिकलं नाही. या गरिबीला कंटाळून प्रभाकर भारती यांनी बुधवारी मध्यरात्री आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना सतावत असलेल्या सर्व प्रश्नांना ते येथेच सोडून गेले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई शिवाजी सुरवसे म्हणाले, प्रभाकर हा कष्टाळू शेतकरी. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आमच्या परिसरात पाऊसच झाला नाही. त्यामुळे जमीन नापीक झाली. प्रभाकरच्या शेतातील तुरीचं पीकही वाळून गेलं. मुलांच्या शिक्षणाचा आणि शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा बोजा त्याच्यावर होता. या संदर्भात तो कोणाशी बोलला नाही. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. बोअर घेऊन पाण्याची शेती करण्याचा प्रयत्न प्रभाकरचा होता. त्यामुळेच त्यांनी हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. परंतु, नियतीच्या मनात वेगळेच होते. पाणीही लागले नाही. याच विवंचनेत प्रभाकरने आपली जीवनयात्रा संपविली. (वार्ताहर)बुधवारी मध्यरात्री लातूर ते लोदगा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या आंब्याच्या झाडाला प्रभाकर भारती यांचा मृतदेह लटकत असलेल्या अवस्थेत ग्रामस्थांनी पाहिला. भारती कुटुंबियांना हे कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टाहो फोडला. पत्नी, मोठा भाऊ, वृद्ध आई-वडील, मुलगी, मुलगा यांनी एकच हंबरडा फोडला. हलाखीच्या परिस्थितीतून जीवन जगणारे कुटुंब म्हणून प्रभाकर भारती यांच्या कुटुंबियांकडे गाव पाहत होते. प्रभाकरच्या आत्महत्येमुळे गावातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.