शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची --- औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक ...

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची

---

औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बिकट, पण गावविकासाची आस असलेल्यांना गावकऱ्यांनी कारभारी बनवले. यात सरपंच आणि उपसरपंचपदांना ठराविक मानधन मिळणार, तर तेवढाच वेळ खर्ची करणाऱ्या सदस्यांना मात्र, चहापानावरच समाधान मानावे लागणार आहे.

६१७ गावांच्या ग्रामपंचायतींत ४६९९ सदस्य निवडून आले आहेत. त्यातून ६१७ सरपंच आणि ६१७ उपसरपंच बनले. लोकसंख्येच्या निकषावर या पदाधिकाऱ्यांना १ ते ५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल. मात्र, ज्या सदस्यांचे रोज काम केले, तरच कुटुंब चालते, त्यांची यामुळे अडचण झाली आहे. अनेकांना ते गावात थांबल्यास त्यांच्या जागेवर मजूर लावावा लागतो. त्याची झळ पोहोचत असल्याने अनेकजण सक्रिय कामातून अलिप्त राहताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे किमान त्यांना तरी मानधन मिळावे, अशी भावना ग्रामपंचायत सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

आमदार, खासदारांना पगार, पेन्शन मिळते; तर गावविकासात गावकऱ्यांच्या सेवेत दिवस-रात्र काम करणाऱ्या सदस्यांना मानधन का नको, असा सवालही गावगाड्याचे कारभारी करायला लागले आहेत, तर ज्यांना गरज नाही, ते नाकारतील, परंतु निवडून आल्यावर प्रोत्साहन भत्ता म्हणून तरी मानधन मिळायला हवे, असे सदस्यांचे म्हणणे आहे.

---

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती

६१७

---

निवडून आलेले सदस्य

४६९९

---

सरपंच

६१७

---

सरपंच काय म्हणतात...

--

होतकरू तरुण, शेतकरी निवडणुकीत निवडून आले. ते कामधंदा सोडून गावाच्या विकासासाठी वेळ‌ देतात. त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. त्यांनाही मानधन मिळाल्यास ते पूर्णवेळ गावाच्या विकासाला देऊ शकतील.

- विशाल गिरी, सरपंच, निंबायती

---

स्वत:चे काम करून गावगाड्याचा कारभार शक्य होत नाही. किमान ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्या सदस्यांना तरी मानधन दिले पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, ते स्वत:हून नाकारतील.

- गजानन ढगे, सरपंच, आमखेडा

---

रोज कमवून जगणाऱ्यांना, पण गाव विकासाची तळमळ असणाऱ्यांनाही नागरिकांनी निवडून दिले. रोजगार बुडवून घरी राहिल्याने त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम व्हायला नको, पण गावाला त्यांची गरज आहे, अशा सदस्यांनाही कुटुंब चालेल एवढे मानधन मिळावे.

- मनीषा शेळके, उपसरपंच, कुंबेफळ