शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची --- औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक ...

ग्रामपंचायतींचे कारभारी : होतकरू गरजू सदस्यांना गरज मानधनाची

---

औरंगाबाद : जिल्ह्यात नुकत्याच ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात अनेक होतकरू आणि आर्थिक परिस्थिती बिकट, पण गावविकासाची आस असलेल्यांना गावकऱ्यांनी कारभारी बनवले. यात सरपंच आणि उपसरपंचपदांना ठराविक मानधन मिळणार, तर तेवढाच वेळ खर्ची करणाऱ्या सदस्यांना मात्र, चहापानावरच समाधान मानावे लागणार आहे.

६१७ गावांच्या ग्रामपंचायतींत ४६९९ सदस्य निवडून आले आहेत. त्यातून ६१७ सरपंच आणि ६१७ उपसरपंच बनले. लोकसंख्येच्या निकषावर या पदाधिकाऱ्यांना १ ते ५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळेल. मात्र, ज्या सदस्यांचे रोज काम केले, तरच कुटुंब चालते, त्यांची यामुळे अडचण झाली आहे. अनेकांना ते गावात थांबल्यास त्यांच्या जागेवर मजूर लावावा लागतो. त्याची झळ पोहोचत असल्याने अनेकजण सक्रिय कामातून अलिप्त राहताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे किमान त्यांना तरी मानधन मिळावे, अशी भावना ग्रामपंचायत सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

आमदार, खासदारांना पगार, पेन्शन मिळते; तर गावविकासात गावकऱ्यांच्या सेवेत दिवस-रात्र काम करणाऱ्या सदस्यांना मानधन का नको, असा सवालही गावगाड्याचे कारभारी करायला लागले आहेत, तर ज्यांना गरज नाही, ते नाकारतील, परंतु निवडून आल्यावर प्रोत्साहन भत्ता म्हणून तरी मानधन मिळायला हवे, असे सदस्यांचे म्हणणे आहे.

---

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती

६१७

---

निवडून आलेले सदस्य

४६९९

---

सरपंच

६१७

---

सरपंच काय म्हणतात...

--

होतकरू तरुण, शेतकरी निवडणुकीत निवडून आले. ते कामधंदा सोडून गावाच्या विकासासाठी वेळ‌ देतात. त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळायला हवा. त्यांनाही मानधन मिळाल्यास ते पूर्णवेळ गावाच्या विकासाला देऊ शकतील.

- विशाल गिरी, सरपंच, निंबायती

---

स्वत:चे काम करून गावगाड्याचा कारभार शक्य होत नाही. किमान ज्या सदस्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्या सदस्यांना तरी मानधन दिले पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, ते स्वत:हून नाकारतील.

- गजानन ढगे, सरपंच, आमखेडा

---

रोज कमवून जगणाऱ्यांना, पण गाव विकासाची तळमळ असणाऱ्यांनाही नागरिकांनी निवडून दिले. रोजगार बुडवून घरी राहिल्याने त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम व्हायला नको, पण गावाला त्यांची गरज आहे, अशा सदस्यांनाही कुटुंब चालेल एवढे मानधन मिळावे.

- मनीषा शेळके, उपसरपंच, कुंबेफळ