शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

हिंगोलीकरांना डेंग्यूची धास्ती

By admin | Updated: November 8, 2014 23:39 IST

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शासकीय यंत्रणा तो डेंग्यू नसल्याचे तर खाजगी रुग्णालये तो डेंग्यूच असल्याचे सांगतात. त्यामुळे साधा ताप आला तरी लोक धास्तीने रुग्णालय गाठत आहेत. त्यात अनेकजण नाहक खर्चाने हैराण आहेत. बदललेले वातावरण व डासांचा प्रादुर्भाव यात भर पाडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.यावर्षी अल्पपर्जन्यामुळे दिवसा कडक ऊ न व रात्री थंडी असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे. त्यातच पाणीटंचाईची चाहूलही अनेक ठिकाणी लागत आहे. त्यामुळे घरात पाण्याची साठवणूक करावी लागते. मात्र कोरडा दिवस पाळायला कोणीही तयार नाही. त्यामुळे जिल्हा डेंग्यूच्या छायेखाली असतानाही त्याचे गांभीर्य कोणालाही नसल्याचे दिसते. आरोग्य यंत्रणाही जेथे साथ उद्भवली तेथेच मलमपट्टी करीत आहे. तर जि.प., नगरपालिका, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता व जनजागरण ही आपली जबाबदारी आहे, असे वाटतच नाही. शिवाय रुग्ण हिवतापाचा की डेंग्यूचा याचे निदानही लवकर होत नाही. या चक्रव्यूहात अडकलेली सामान्य जनता डेंग्यूच्या विळख्यात सापडत आहे. हिंगोली शहराचा विचार केला तर स्वच्छता नियमित होणे शक्यच नाही. कारण पालिकेकडेच तेवढी यंत्रणा नाही. पाणीही तीन ते चार दिवसाआड मिळते. डासांचा प्रादुर्भावही आहे. अधूनमधून धूरफवारणी होते. हिवताप व तापाचेही रुग्ण आढळले तरी खाजगीचा रस्ता धरतात. आरोग्य विभाग गाफिलच राहतो. उपायही सुचविले जात नाहीत. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. रुग्ण आढळल्यावरच धावपळ होते. ग्रामपंचायती स्वच्छता व पाण्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्य विभागही सतर्कतेसाठी प्रयत्न करीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)