शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हिंगोलीकरांना डेंग्यूची धास्ती

By admin | Updated: November 8, 2014 23:39 IST

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शासकीय यंत्रणा तो डेंग्यू नसल्याचे तर खाजगी रुग्णालये तो डेंग्यूच असल्याचे सांगतात. त्यामुळे साधा ताप आला तरी लोक धास्तीने रुग्णालय गाठत आहेत. त्यात अनेकजण नाहक खर्चाने हैराण आहेत. बदललेले वातावरण व डासांचा प्रादुर्भाव यात भर पाडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.यावर्षी अल्पपर्जन्यामुळे दिवसा कडक ऊ न व रात्री थंडी असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे. त्यातच पाणीटंचाईची चाहूलही अनेक ठिकाणी लागत आहे. त्यामुळे घरात पाण्याची साठवणूक करावी लागते. मात्र कोरडा दिवस पाळायला कोणीही तयार नाही. त्यामुळे जिल्हा डेंग्यूच्या छायेखाली असतानाही त्याचे गांभीर्य कोणालाही नसल्याचे दिसते. आरोग्य यंत्रणाही जेथे साथ उद्भवली तेथेच मलमपट्टी करीत आहे. तर जि.प., नगरपालिका, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता व जनजागरण ही आपली जबाबदारी आहे, असे वाटतच नाही. शिवाय रुग्ण हिवतापाचा की डेंग्यूचा याचे निदानही लवकर होत नाही. या चक्रव्यूहात अडकलेली सामान्य जनता डेंग्यूच्या विळख्यात सापडत आहे. हिंगोली शहराचा विचार केला तर स्वच्छता नियमित होणे शक्यच नाही. कारण पालिकेकडेच तेवढी यंत्रणा नाही. पाणीही तीन ते चार दिवसाआड मिळते. डासांचा प्रादुर्भावही आहे. अधूनमधून धूरफवारणी होते. हिवताप व तापाचेही रुग्ण आढळले तरी खाजगीचा रस्ता धरतात. आरोग्य विभाग गाफिलच राहतो. उपायही सुचविले जात नाहीत. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. रुग्ण आढळल्यावरच धावपळ होते. ग्रामपंचायती स्वच्छता व पाण्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्य विभागही सतर्कतेसाठी प्रयत्न करीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)