शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

महामार्गाची ‘सावली’ हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:12 IST

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हजारो झाडांची रुंदीकरणाच्या नावाखाली सध्या युद्धपातळीवर कत्तल सुरु असल्याने महामार्ग बोडखा दिसू लागला आहे. अनेक जुनी झाडे तुटल्याने महामार्गावरील प्रवाशांची सावली हरवली आहे.

रऊफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील हजारो झाडांची रुंदीकरणाच्या नावाखाली सध्या युद्धपातळीवर कत्तल सुरु असल्याने महामार्ग बोडखा दिसू लागला आहे. अनेक जुनी झाडे तुटल्याने महामार्गावरील प्रवाशांची सावली हरवली आहे.औरंगाबाद -जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत अजून ठोस माहिती जनतेपर्यंत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. काम सुरु करण्यापूर्वी आहे त्या झाडांची तोड जोरात सुरु आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या कामकाजाबाबत जनतेपर्यंत खरी माहिती द्यावी, अशी मागणी वृक्षतोड पाहून जनता करु लागली आहे. अनेकांनी वृक्षतोडीस विरोधही दर्शविला असून वृक्षतोडीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही होऊ लागली आहे.वन विभागाच्या वतीने १ ते ७ जुलै २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करीत असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला. सर्वत्र वृक्ष लागवड करण्यात आली पण प्रत्यक्षात ५० टक्केही झाडे जगली नाही. सरकार एकीकडे झाडे लावा असा संदेश देत असताना दुसरीकडे रस्ता रुंदीकरण करताना ५० ते ६० वर्षांची जुनी झाडे तोडली जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा असमतोल वाढत असल्याचे चित्र आहे.पोरके झालो आम्ही, पोरकी मातीऔरंगाबाद -जळगाव महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यात दुचाकींची संख्या जास्त असते. त्यांना उन्हाळ्यात विसावा घेण्यासाठी या झाडाचा आधार घ्यावा लागतो, तर पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी हीच झाडे आश्रय देतात. पण आजच्या घडीला या रस्त्यावर आता कुठेही थांबता येणार नाही. लांब अंतरापर्यंत झाडे तोडण्यात आलेली आहेत. रस्ता झाडाविना पोरका झाला आहे. आता नवीन झाडे लावण्यात आली तरी किमान दहा वर्षांनी त्यांची सावली मिळू शकते.एकंदरीत आजच्या परिस्थितीवरुन ‘भग्नावस्थेत आहे महामार्ग, वृक्षवल्ली खुणावते आहे, पोरके झालो आम्ही, पोरकी झाली माती’ या काव्यपंक्ती आठवल्याशिवाय राहवत नाही.