शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

रस्ते, समाजमंदिरांच्या कामांवर सर्वाधिक खर्च

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत निधीती त्यासाठी केला आहे.

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत आपल्या निधीतील आतापर्यंत खर्चित केलेल्या रक्कमेचा वापर प्रामुख्याने त्यासाठी केला आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याने दुष्काळाची भयावह परिस्थिती अनुभवली. जालना शहरात अनेक भागांमध्ये जलवाहिनी अंथरलेली नसल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या आमदार निधीतून प्रामुख्याने जलवाहिनी अंथरणे, अंतर्गत जलवाहिनी टाकणे त्याचबरोबर रस्त्यांच्या कामांवरही भर दिला. ७३ लाख ७० हजारांच्या खर्चातील जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदनचे आ. चंद्रकांत दानवे यांनी ४५.९२ लाखांच्या खर्चात सामाजिक सभागृहे आणि रस्त्यांच्या कामांवर भर दिला आहे. त्याचबरोबर नवीन पथदिवे, विविध समाजातील स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीची कामे यासाठी निधी दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी सामाजिक सभागृहे, स्मशानभुमी शेड, गावअंतर्गत सिमेंट रस्ते या कामांवर भर दिला. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांसाठीही त्यांनी निधी दिला. परतूरचे आ. सुरेश जेथलिया यांनी ६ लाख ७६ हजारांच्या खर्चामध्ये सांस्कृतिक सभागृह, आणि गावअंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्रामुख्याने निधी दिला. बदनापूरचे आ. संतोष सांबरे यांनी ४७ लाखांच्या खर्चामध्ये सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह या कामांसाठी निधी दिला आहे. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातील हे शेवटचे वर्ष असल्याने विविध अपूर्ण राहिलेल्या कामांवरही भर देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आमदार निधीच्या खर्चातून आवश्यक कामांची निवड करण्यातही काही आमदारांचा वेळ जात आहे. मात्र १५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागणार असल्याने प्रमुख कामांचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन व विकास कार्यालयाकडे पाठविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे. मतदारसंघात यापूर्वी काही कामांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसते. अशा कामांनाही निधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांमार्फत कामांची यादी करून त्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधितांमार्फत तातडीने देण्याकडे आमदारांचा कल आहे. (प्रतिनिधी)अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचाही प्रयत्ननिवडणूका जवळ आल्याने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नही आमदारांकडून होत आहे. त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे ज्या कामांसाठी आश्वासने दिली होती, ती कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात आहे.आचारसंहिता १५ आॅगस्टनंतर केव्हाही लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आमदार निधीअंतर्गत आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे झटपट करण्याच्या प्रयत्नात काहीजण आहेत. त्यासाठी काही कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.