शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

रस्ते, समाजमंदिरांच्या कामांवर सर्वाधिक खर्च

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत निधीती त्यासाठी केला आहे.

जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत आपल्या निधीतील आतापर्यंत खर्चित केलेल्या रक्कमेचा वापर प्रामुख्याने त्यासाठी केला आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याने दुष्काळाची भयावह परिस्थिती अनुभवली. जालना शहरात अनेक भागांमध्ये जलवाहिनी अंथरलेली नसल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या आमदार निधीतून प्रामुख्याने जलवाहिनी अंथरणे, अंतर्गत जलवाहिनी टाकणे त्याचबरोबर रस्त्यांच्या कामांवरही भर दिला. ७३ लाख ७० हजारांच्या खर्चातील जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदनचे आ. चंद्रकांत दानवे यांनी ४५.९२ लाखांच्या खर्चात सामाजिक सभागृहे आणि रस्त्यांच्या कामांवर भर दिला आहे. त्याचबरोबर नवीन पथदिवे, विविध समाजातील स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीची कामे यासाठी निधी दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी सामाजिक सभागृहे, स्मशानभुमी शेड, गावअंतर्गत सिमेंट रस्ते या कामांवर भर दिला. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांसाठीही त्यांनी निधी दिला. परतूरचे आ. सुरेश जेथलिया यांनी ६ लाख ७६ हजारांच्या खर्चामध्ये सांस्कृतिक सभागृह, आणि गावअंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्रामुख्याने निधी दिला. बदनापूरचे आ. संतोष सांबरे यांनी ४७ लाखांच्या खर्चामध्ये सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह या कामांसाठी निधी दिला आहे. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातील हे शेवटचे वर्ष असल्याने विविध अपूर्ण राहिलेल्या कामांवरही भर देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आमदार निधीच्या खर्चातून आवश्यक कामांची निवड करण्यातही काही आमदारांचा वेळ जात आहे. मात्र १५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागणार असल्याने प्रमुख कामांचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन व विकास कार्यालयाकडे पाठविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे. मतदारसंघात यापूर्वी काही कामांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसते. अशा कामांनाही निधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांमार्फत कामांची यादी करून त्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधितांमार्फत तातडीने देण्याकडे आमदारांचा कल आहे. (प्रतिनिधी)अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचाही प्रयत्ननिवडणूका जवळ आल्याने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नही आमदारांकडून होत आहे. त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे ज्या कामांसाठी आश्वासने दिली होती, ती कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात आहे.आचारसंहिता १५ आॅगस्टनंतर केव्हाही लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आमदार निधीअंतर्गत आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे झटपट करण्याच्या प्रयत्नात काहीजण आहेत. त्यासाठी काही कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.