शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

केज तालुक्यातील २० गावांत ‘हाय अलर्ट’

By admin | Updated: September 26, 2016 00:14 IST

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे

मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे. पाच वर्षानंतर तीन जिल्ह्यांतील ७३ गावांच्या सिंचनाचा आणि ६१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोणत्याही क्षणी मांजराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे धरणाखालील २० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा, केजडी, बोभाटी, खटकळी, होळना, लेंडी मारवड नदी या नद्यांसह नाल्या-ओढ्यांना मोठमोठे पूर आले होते. उंदरी, हादगाव, चिंचोलीमाळी, येवता, भालगाव, सौंदना, केवड, वरपगाव या गावांच्या नदीपात्रात पाणी न मावल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेले. परिणामी सुपीक जमीन धुऊन गेली आहे. त्यामुळे शेतीचे आणि पिकाचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या नोंदीनुसार २२४ दलघमी क्षमता असलेल्या मांजरा धरणात १८१.४८० दलघमी एवढा पाणीसाठा वाढला आहे. पाणी पातळी ६४१.३२ मीटर एवढी असून, जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ७५ टक्के एवढी आहे, तर मृतसाठ्यासह ही टक्केवारी ८०.९८ टक्के एवढी असल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखाधिकारी अनिल मुळे यांनी दिली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ ४०० क्युमेक प्रती सेकंद या वेगाने आहे.