शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘आयएसओ’मुळे ग्रा.पं.होणार हायटेक

By admin | Updated: August 21, 2014 23:25 IST

विठ्ठल भिसे, पाथरी ई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले

विठ्ठल भिसे, पाथरीई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले. त्यानंतर आता ग्रामपंचायती आयएसओ करून हायटेक करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू झाला आहे. परभणी जिल्ह्यात ९० ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आयएसओ करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. २८ आॅगस्टपर्यंत यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या गतवर्षीपासून आयएसओ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक अंगणवाड्यांच्या परिसरात सर्व भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याच बरोबर गुणवत्तेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने आता ग्रामपंचायती आयएसओ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तयारी करून घेतली जात आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत विकासाचा महत्त्वाचा दूवा समजला जातो. ग्रामपंचायतींना सहाय्यता मिळाल्यापासून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ लागला आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाबत मात्र आजपर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही. ग्रा़ पं़ ना कार्यालय उपलब्ध नसल्याने ग्रा़ पं़ चा कारभार सरपंचाच्या घरूनच चालायचा. ग्रामसेवकांची बॅग सांभाळणारे लोकप्रतिनिधी असायचे. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. संत गाडगे बाबा अभियान, तंटामुक्त अभियान, पर्यावरण संतूलित समृद्ध ग्राम योजना, निर्मलग्राम, नरेगासारख्या योजनेमुळे ग्रा.पं. कारभारात अमुलाग्र बदल झाले आहेत. टेबल, खूर्च्या उपलब्ध नसणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आता संगणक कक्ष तयार झाले आहेत. तेराव्या वित्त आयोगातून शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायतीमध्ये मोठी सुधारणा होऊ लागल्याने आता ग्रामपंचायती ‘आयएसओ’ करून हायटेक केल्या जाणार आहेत. ग्रा. पं. कार्यालयात भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यापासून ते सामाजिक कामात ग्रामपंचायतीचा सहभाग या मोहिमेत वाढविला जाणार आहे. जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात ९० ग्रामपंचायती आयएसओसाठी प्रास्तावित करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीचे नामांकन २८ आॅगस्टपर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर विशेष पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींना सुधारण्यासाठी वेळ मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायत आयएसओ करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.