शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अरे बाबा, मोबाइल मिळाला म्हणून पीएमसाहेबांना मेल कर

By admin | Updated: July 16, 2017 00:36 IST

औरंगाबाद : मोबाइल चोरीला गेला आणि पोलीस प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार मोहित नावंदर नावाच्या संगणक शाखेच्या विद्यार्थ्याने थेट पंतप्रधानांनाच केली

डॉ. खुशालचंद बाहेती । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मोबाइल चोरीला गेला आणि पोलीस प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार मोहित नावंदर नावाच्या संगणक शाखेच्या विद्यार्थ्याने थेट पंतप्रधानांनाच केली. ती तक्रार तब्बल दीड वर्षानंतर जिन्सी पोलीस ठाण्याकडे वर्ग झाली. मग जिन्सी पोलिसांनी शोध सुरू केला. मधल्या काळात मोहितने औरंगाबाद सोडले. तो पुण्याला गेला. त्याने स्वत:च मोबाइलमधील ट्रॅकरच्या साहाय्याने चोरीला गेलेला मोबाइल शोधलाही व मिळवलाही. आता ही एवढी बाब त्याने थेट पीएमसाहेबांना कळवावी, तसा एखादा मेल तरी करावा, म्हणजे हे प्रकरण मिटेल, असे साकडेच पोलीस मोहितला घालत आहेत. यासंबंधीची कहाणी मोठी रंजक आहे. ५ जानेवारी २०१५ रोजी मोहितचा मोबाइल तो शिकत असलेल्या महाविद्यालयातून चोरीला गेला. हा मोबाइल त्याला त्याच्या मोठ्या भावाने पहिल्या पगारातून भेट दिला होता, त्यामुळे त्यात त्याच्या भावना दडलेल्या होत्या. मोबाइल चोरीची तक्रार घेऊन त्याने जिन्सी पोलीस ठाणे गाठले; पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. महाविद्यालयाची बदनामी होईल, म्हणून अशा तक्रारी घेता येत नाहीत, असे कारण मोहितला सांगण्यात आले; मात्र जिद्दी मोहितने पाठपुरावा चालूच ठेवला. शेवटी जिन्सी पोलिसांनी मोबाइल हरवल्याची नोंद घेतली; पण भावाकडून भेट मिळालेला मोबाइल सापडत नाही आणि त्यासाठी पोलीस काही करीत नाहीत, यामुळे तो अस्वस्थ झाला. या अस्वस्थतेतूनच त्याने १० आॅगस्ट २०१६ रोजी थेट पंतप्रधानांचे तक्रार निवारण पोर्टल म्हणजे ‘प्राइम मिनिस्टर ग्रिव्हिएन्स पोर्टल’वर तक्रार नोंदवली. या पोर्टलवरून ही तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत जिन्सी पोलीस ठाण्यात आली. दरम्यान, मोहितने मोबाइलमधील ट्रॅकरच्या साहाय्याने आपला मोबाइल शोधला व मिळवलाही. मोहित नावंदरला जिन्सी पोलिसांनी ठाण्यात बोलावण्याचा प्रयत्न केला; पण मी आता औरंगाबादमध्ये राहत नाही व माझा मोबाइल मला मिळाला आहे, असे त्याने कळवून टाकले; मात्र ‘प्राइम मिनिस्टर ग्रिव्हिएन्स पोर्टल’वरून मेल व फोनने पाठपुरावा सुरूच होता. त्यामुळे जिन्सी पोलिसांना अहवाल पाठवणे गरजेचे होते, म्हणून मोहितने समक्ष येऊन जबाब नोंदवावा, अशी विनंती जिन्सी पोलीस करीत होते; पण मी येऊ शकत नाही, असे मोहितने स्पष्ट केले; मात्र यावर मग ‘निदान मोबाइल मिळाला एवढा निरोप तरी प्राइम मिनिस्टरसाहेबांना द्या’ अशी विनवणी पोलिसांना करावी लागली.