शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हर्सूल तलाव तुडुंब, पोलीस बंदोबस्त वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:03 IST

हर्सूल तलाव भरल्याने शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे ...

हर्सूल तलाव भरल्याने शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांमधील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीही तलाव पूर्णपणे भरला होता. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. सोमवारी तलावात २४ फुटांपर्यंत पाणी होते. मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीने तलाव तुडुंब भरला. रात्री सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले. नदीपात्राच्या परिसरात अनेक वसाहती आहेत. पावसाचे पाणी वाढले तर अनेक वसाहतींमधील नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ मनपावर आलेली आहे. बुधवारी सकाळीच मनपाने काही वसाहतींमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता अशोक पद्मे यांनी दिली. हर्सूल तलाव भरल्याचे काही फोटो सकाळीच सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरुणाई सकाळीच तलावाच्या सांडवा परिसरात गर्दी करू लागली. दुपारी गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला.

खाम नदी वाहू लागली आहे

गतवर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पालिकेने येथील जलशुद्धीकरण यंत्रणा दुरुस्त करून जुन्या शहरातील काही भागांना पाणीपुरवठा सुरू केला होता. उन्हाळ्यातही तलावात पाणी असल्याने आवश्यकतेनुसार 3 ते 4 एमएलडी पाण्याचा उपसा पालिकेकडून केला जात असे. याप्रमाणे आजवर पाणीपुरवठा सुरू आहे. आता तलाव पूर्णपणे भरल्याने 4 ते 5 एमएलडी पाणी उपसा करून जुन्या शहरातील आणखी वाॅर्डांत हे पाणी वळविले जाईल. त्यातून जायकवाडी धरणातील पाणी इतर भागांना वळवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करता येईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी स्पष्ट केले.

दररोज ५ एमएलडी पाण्याचा वापर

१९५४ साली निजाम स्टेटने हर्सूल तलाव बांधला. १९७५ पर्यंत शहराची तहान हर्सूल तलावातून भागत होती. नहरींच्या पाण्याचीही शहराला मदत होत होती. शहराची लोकसंख्या वाढत गेल्याने जायकवाडीहून पाणी आणणे सुरू झाले. मात्र, हर्सूलचा उपसा आजही कायम आहे. शहरातील १६ पेक्षा अधिक वॉर्डांना आजही हर्सूलचेच पाणी देण्यात येते. दररोज ५ एमएलडी पाण्याचा उपसा मनपाकडून करण्यात येतो.