शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतकरी कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरू...

By admin | Updated: September 8, 2015 00:39 IST

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत.

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत. इतरांनी दिलेली मदत आम्ही आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही फक्त पोस्टमन आहोत, अशी भूमिका यावेळी नाना पाटेकर यांनी मांडली. सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी रोख ७७ हजार रुपये जमा झाले. त्याशिवाय अविनाश चौधरी ५० हजार, बद्रीनाथ खेडकर ३० हजार, केशव कुलकर्णी १५ हजार, प्रकाश कुलकर्णी १५ हजार, प्रतिभा मुळे १५ हजार, बी. पी. सूर्यवंशी ५ हजार, सुभाष पल्लेवार ५ हजार आणि पुण्याच्या सिमेंट कंपनीने २ लाख रुपयांचा धनादेश संयोजकांकडे सुपूर्द केला. मदत कुणाला द्यावी....सर्व काही सरकारनेच करावे, ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका नाना व मकरंद यांनी तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किमान १५ हजार रुपयांचा निनावी (अकाऊंट पेयी) धनादेश मकरंद किंवा माझ्याकडे पाठवावा, त्यावर मागे मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यापुढे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचे तीन महिने वगळून उर्वरित ९ महिने हाताला काम दिले पाहिजे, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. त्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राजीव खांडेकर यांच्यासह फाऊंडेशन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील तब्बल २०० मुलांना शिकविण्याची जबाबदारी श्यामसुंदर कणके यांनी घेतली आहे. काही मुलांच्या आयाही त्यांच्यासोबत आहेत. या मुलांच्या जेवणाचा खर्च भावेश सराफ व चौधरी यांनी आजपासून उचलला. ४जुगलकिशोर तापडिया यांनी एक लाख शेतकऱ्यांचा विमा काढण्याची जबाबदारी घेतली आहे. ४शहरातील काही बालकांनी दहीहंडी न करता त्यांचे राहिलेले पैसे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हाती आणून दिले. ४मंगेश कामटे यांनी १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश दिला.