शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शेतकरी कुटुंबियांसाठी मदतीचा ओघ सुरू...

By admin | Updated: September 8, 2015 00:39 IST

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत.

औरंगाबाद : बीड व लातूरच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त आमच्या खिशातून दिले; परंतु आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार म्हणून शेकडो हात पुढे आले आहेत. इतरांनी दिलेली मदत आम्ही आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही फक्त पोस्टमन आहोत, अशी भूमिका यावेळी नाना पाटेकर यांनी मांडली. सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी रोख ७७ हजार रुपये जमा झाले. त्याशिवाय अविनाश चौधरी ५० हजार, बद्रीनाथ खेडकर ३० हजार, केशव कुलकर्णी १५ हजार, प्रकाश कुलकर्णी १५ हजार, प्रतिभा मुळे १५ हजार, बी. पी. सूर्यवंशी ५ हजार, सुभाष पल्लेवार ५ हजार आणि पुण्याच्या सिमेंट कंपनीने २ लाख रुपयांचा धनादेश संयोजकांकडे सुपूर्द केला. मदत कुणाला द्यावी....सर्व काही सरकारनेच करावे, ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका नाना व मकरंद यांनी तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किमान १५ हजार रुपयांचा निनावी (अकाऊंट पेयी) धनादेश मकरंद किंवा माझ्याकडे पाठवावा, त्यावर मागे मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यापुढे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचे तीन महिने वगळून उर्वरित ९ महिने हाताला काम दिले पाहिजे, त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले. त्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम, राजीव खांडेकर यांच्यासह फाऊंडेशन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील तब्बल २०० मुलांना शिकविण्याची जबाबदारी श्यामसुंदर कणके यांनी घेतली आहे. काही मुलांच्या आयाही त्यांच्यासोबत आहेत. या मुलांच्या जेवणाचा खर्च भावेश सराफ व चौधरी यांनी आजपासून उचलला. ४जुगलकिशोर तापडिया यांनी एक लाख शेतकऱ्यांचा विमा काढण्याची जबाबदारी घेतली आहे. ४शहरातील काही बालकांनी दहीहंडी न करता त्यांचे राहिलेले पैसे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या हाती आणून दिले. ४मंगेश कामटे यांनी १ लाख ५ हजार रुपयांचा धनादेश दिला.