शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:57 IST

जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामान खात्याने मराठवाड्यात दिलेला पावसाचा इशारा अखेर खरा ठरला. जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला. अन्वा, तीर्थपुरी, गोंदी या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन, बदनापूर, घनसावंगी व अंबड तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. रविवारी सकाळी आठवाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७९.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.जालना शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. अधून-मधून विश्रांती घेत रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. सात ते आठ तास झालेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. काही भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. अनेक भागातील वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.दुपारी एकनंतर पावसाने उघाड दिली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तालुक्यातील जामवाडी, माळशेंद्रा, वंजारउमद्र, गोंदेगाव, पीरपिंपळगाव, घाणेवाडी, निधोना, इंदेवाडी, कारला, धारकल्याण, नंदापूर, कडवंची, रामनगर, नागेवाडी, गुंडेवाडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला. जालना तालुक्यात २२.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परतूर तालुक्यातही दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.अंबड तालुक्यात सर्वाधिक ५४. ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अंबड शहरातील नाले सफाईचे काम रखडल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.मंठा, जाफराबाद, घनसावंगी, भोकरदन तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पोळा सणावरील दुष्काळाचे सावट काही अंशी कमी झाले.अंबड : मोसमातील पहिल्याच दमदार पावसाने अंबड शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. शनिवारपासून संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. रविवारीसुद्धा शहरात दमदार पाऊस झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले.मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी पालिकेच्या कडून वेगळा निधी उपलब्ध असतो. मात्र नगरपालिकेने नाले सफाई केली नाही. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या टिळकपथ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले.दिवसभर टिळकपथ मार्गावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. नाल्यांची सफाई झाली नसल्याने नाल्यातील घाण व पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. विशेष म्हणजे नवीन अंबडचे पावसाचे पाणी ज्या तलावात साचले जायचे तेथे काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने घाण पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत येऊन साचू लागले आहे.याबाबत व्यापाºयांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र याविषयी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई पालिकेने केली नाही.यामुळे व्यापाºयात संताप आहे.शहागड : दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहागड बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, यावर्षी समाधानकारक पाऊस पडलाच नसल्याने बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. रविवरी झालेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत या बंधाºयातील पाणीपातळी कमी होती. मात्र, सायंकाळी सहानंतर गुळज (ता. गेवराई) बंधºयातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे शहागडसह परिसरातील नदीची पाणी पातळी अचानक वाढली. पाणी बंधाºयावरून वाहू लागले. बंधाºयाचे दरवाजे उघडले नसल्याने पाणी अडवले गेले. परिणामी गोदावरी नदीला लागून असलेल्या चाँद-सूरज नाल्यात पाणी साचल्याने शहागड-पैठण मार्ग बंद झाला. पैठण रोडवरील अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव, आपेगाव या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार दत्तात्रेय भारस्कर, हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीच्या काठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.