शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन मंडळांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:57 IST

जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामान खात्याने मराठवाड्यात दिलेला पावसाचा इशारा अखेर खरा ठरला. जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेला पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरू राहिला. अन्वा, तीर्थपुरी, गोंदी या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. भोकरदन, बदनापूर, घनसावंगी व अंबड तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. रविवारी सकाळी आठवाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७९.४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.जालना शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. अधून-मधून विश्रांती घेत रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. सात ते आठ तास झालेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. काही भागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. अनेक भागातील वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.दुपारी एकनंतर पावसाने उघाड दिली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तालुक्यातील जामवाडी, माळशेंद्रा, वंजारउमद्र, गोंदेगाव, पीरपिंपळगाव, घाणेवाडी, निधोना, इंदेवाडी, कारला, धारकल्याण, नंदापूर, कडवंची, रामनगर, नागेवाडी, गुंडेवाडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला. जालना तालुक्यात २२.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परतूर तालुक्यातही दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.अंबड तालुक्यात सर्वाधिक ५४. ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अंबड शहरातील नाले सफाईचे काम रखडल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.मंठा, जाफराबाद, घनसावंगी, भोकरदन तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पोळा सणावरील दुष्काळाचे सावट काही अंशी कमी झाले.अंबड : मोसमातील पहिल्याच दमदार पावसाने अंबड शहरातील मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. शनिवारपासून संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. रविवारीसुद्धा शहरात दमदार पाऊस झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले.मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी पालिकेच्या कडून वेगळा निधी उपलब्ध असतो. मात्र नगरपालिकेने नाले सफाई केली नाही. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या टिळकपथ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले.दिवसभर टिळकपथ मार्गावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. नाल्यांची सफाई झाली नसल्याने नाल्यातील घाण व पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली होती. विशेष म्हणजे नवीन अंबडचे पावसाचे पाणी ज्या तलावात साचले जायचे तेथे काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने घाण पाणी शहरातील मुख्य बाजारपेठेत येऊन साचू लागले आहे.याबाबत व्यापाºयांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र याविषयी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई पालिकेने केली नाही.यामुळे व्यापाºयात संताप आहे.शहागड : दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहागड बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात येतात. मात्र, यावर्षी समाधानकारक पाऊस पडलाच नसल्याने बंधाºयाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते. रविवरी झालेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत या बंधाºयातील पाणीपातळी कमी होती. मात्र, सायंकाळी सहानंतर गुळज (ता. गेवराई) बंधºयातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे शहागडसह परिसरातील नदीची पाणी पातळी अचानक वाढली. पाणी बंधाºयावरून वाहू लागले. बंधाºयाचे दरवाजे उघडले नसल्याने पाणी अडवले गेले. परिणामी गोदावरी नदीला लागून असलेल्या चाँद-सूरज नाल्यात पाणी साचल्याने शहागड-पैठण मार्ग बंद झाला. पैठण रोडवरील अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी, डोमलगाव, साष्टपिंपळगाव, बळेगाव, आपेगाव या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार दत्तात्रेय भारस्कर, हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नदीच्या काठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.