शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपासून दमदार पाऊस

By admin | Updated: June 14, 2016 23:52 IST

औरंगाबाद : मान्सूनच्या वाटचालीमधील अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे.

औरंगाबाद : मान्सूनच्या वाटचालीमधील अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. त्याचवेळी तो मराठवाडा विभागातही दाखल होणार आहे. परिणामी मराठवाड्यात शनिवारपासून पुढे सलग चार दिवस दमदार पाऊस बरसणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी लोकमतशी बोलताना दिली.दुष्काळामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत; पण तरीदेखील पंधरा दिवसांपासून मान्सूनची सुरुवातीची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. काही दिवसांपासून मान्सून केरळ किनारपट्टीवरच रेंगाळला होता; परंतु आता परिस्थितीत बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची वाटचाल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि ईशान्येकडील राज्ये व पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत पुढे सरकत आहे. अरबी समुद्र्रातून पुढे येणारा मान्सून कर्नाटक ओलांडून कारवारपर्यंत आला आहे. सध्या तो गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झालेला आहे. आता तो शनिवार दि. १८ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे येथील वेधशाळेच्या संचालिका डॉ. सुनीता देवी यांनी दिली. मराठवाड्यातील मान्सूनच्या आगमनाविषयी त्या म्हणाल्या, मान्सूनचे आगमन साधारण शनिवारीच मराठवाड्यातही होईल. त्यानंतर सलग चार दिवस विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी घाई नकोदुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी तूर्तास पेरणीची घाई करूनये असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी दिला आहे. देवळाणकर म्हणाले की, आपल्याकडील पिकांच्या बियाणांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. साधारणत: कापूस या पिकाची लागवड ही ६० ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय करूनये. त्याप्रमाणे सोयाबीनच्या पेरणीसाठीही ९० मि.मी. पाऊस झालेला असणे गरजेचा आहे.