शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासक नेमण्यासंदर्भात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:54 IST

महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर ४ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. तसेच शहरवासीयांना किमान मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या विरोधात दाखल झालेल्या २१ जनहित याचिकांवर मंगळवारी झालेल्या एकत्रित सुनावणीत खंडपीठाने मनपाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले.कायद्याने जी कर्तव्ये करणे बंधनकारक आहे ते कर्तव्ये पार पाडण्यात महानगरपालिकेला अपयश आले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी, समस्यांसाठी, हक्कासाठी नागरिकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो आहे. त्यामुळे मनपावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.महापालिकेच्या विरोधातील २१ जनहित याचिकांवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एस.एम. गव्हाणे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, स्वच्छ वातावरण, पार्किंग, बेकायदा बांधकाम आदींच्या संदर्भातील याचिकांचा समावेश आहे.मंगळवारच्या सुनावणीत उत्तरानगरीच्या पाणीप्रश्नावर म्हणणे सादर करण्यात आले. या वसाहतीतून वर्षाला १८ लाख रुपयांचे कर मनपा वसूल करते. मात्र, या परिसरातला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनवर मनपा १७ लाख रुपये खर्च करीत नाही. यामुळे येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न रेंगाळला आहे. उल्लेखनीय म्हणजे, खंडपीठाने देखील हे काम करण्यासंदर्भात आदेश देऊनही ते झाले नसल्याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.सुखना नदीपात्रात अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रात ड्रेनेज व कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडले जाते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. असा मुद्दा खंडपीठासमोर उपस्थित करण्यात आला. या आणि अशाच इतर अनेक मुद्यांवर मंगळवारी न्यायालयासमोर सविस्तर म्हणणे मांडण्यात आले. सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, अ‍ॅड. अजित काळे, अ‍ॅड. एन.एल. जाधव, तर मनपातर्फे अ‍ॅड. जयंत शहा, अ‍ॅड. संभाजी टोपे आणि अ‍ॅड. अमित वैद्य, राज्य शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे आणि अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद