औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. केंद्र अधिकाऱ्यांचे राजीनाम्यांचे वाढते प्रमाण, तात्पुरते कर्मचारी, केंद्र आवारात घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्य केंद्रांची अवस्था वाईट होत आहे. आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या केंद्रांमध्ये स्वच्छता असणे गरजेचे आहे. मात्र, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मुख्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रामध्ये वेळेत दुरुस्ती होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पासपोर्टचे प्रश्न निर्माण झाले आहेत. गंभीर परिस्थितीआरोग्य केंद्रांची परिस्थिती गंभीर झालेली आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी, साहित्य, वाढीव कर्मचारी यावर चर्चा करणे गरजेचे आहे, असे मत नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी व्यक्त केले.केंद्रे खराब झाली आहेत आरोग्य केंद्रे खराब झाली आहेत. जवाहर कॉलनीतील आरोग्य केंद्रातील फरशा उखडल्या आहेत. त्या केंद्राची डागडुजी केली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्रे महत्त्वाची आहेत, असे मत नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रात दुरुस्ती करून देण्यास विलंब होतो आहे. पासपोर्टचे काम खोळंबल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, असे नगरसेविका प्रीती तोतला म्हणाल्या. कटकटगेट येथील आरोग्य केंद्र परिसरात कचरा साचलेला आहे. दुपारनंतर तेथे जनावरे येतात. कुत्र्यांचा कळपही तेथे असतो. पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे गटनेते मीर हिदायत अली म्हणाले.आरोग्य केंद्रांचा आढावा दादा कॉलनी, कैसर कॉलनी, शहाबाजार, बायजीपुरा येथील आरोग्य केंद्रांची पाहणी केल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले. ४० वैद्यकीय अधिकारी व १ हजार कर्मचारी आरोग्य विभागात आहेत. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या काळात सर्व ओपीडी आठ तास सुरू राहतील, तसेच हॉस्पिटल्स २४ तास सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले. येथे आहेत आरोग्य केंद्रे, रुग्णालये भीमनगर, भावसिंगपुरा, जुनाबाजार, हर्षनगर, जिन्सी, गरमपाणी, औरंगपुरा, बायजीपुरा, कैसर कॉलनी, दादा कॉलनी, भवनीनगर, नेहरूनगर, हर्सूल, क्रांतीचौक, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, राजनगर, बन्सीलालनगर, पीरबाजार, सिल्कमिल कॉलनी, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, नारेगाव, मुकुंदवाडी, अंबिकानगर, सिडको एन-८, सिडको एन-११.अधिकारी कधी येणार? चिकलठाणा आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. तेथे दुसरा अधिकारी केव्हा येणार. केंद्र अधिकारी नसल्यामुळे रुग्णांवर उपचार होत नाहीत, असा आरोप नगरसेवक संजय चौधरी यांनी केला.पाहणी करून उपाय आरोग्य केंद्रांची पाहणी करून त्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत, याचा निर्णय घेऊ. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सभापती विजय वाघचौरे म्हणाले.
आरोग्य केंद्रांची दुरवस्था
By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST