शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती

By admin | Updated: March 17, 2016 00:04 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या.

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात दौरे केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवक व आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयसक्ती केली आहे.डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्याची मोठी तक्रार कायम गावपातळीवर असते. शिवाय येणाऱ्या तक्रारींतही हा ओघ असतो. त्यातच ग्रामसेवक तर गावात फिरकतही नसल्याच्या तक्रारी जागोजाग ऐकायला मिळाल्या. एकापेक्षा जास्त सज्जे असल्याने दुसऱ्या गावांची नावे सांगून ग्रामसेवक वेळ मारून नेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. त्यातच औंढा तालुक्यातील तुर्कपिंप्रीत तर गंभीर तक्रारी होत्या. त्यामुळे सीईओंनी आता एकापेक्षा जास्त सज्जे असलेल्या ग्रामसेवकांसाठी वेळापत्रकच तयार करण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला. या वेळापत्रकावर सीईओ आर्दड यांच्या स्वाक्षरीने अंमलबजावणी होणार आहे. ठरवून दिलेल्या वाराला दिलेल्या वेळेत संबंधित ग्रामसेवक त्या गावात न आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी तपासण्या होणार आहेत. या अधिकाऱ्यांनीही किती तपासण्या कराव्यात, याचे बंधन घालण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने आरोग्य विभागातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींनी ही तपासणी करायची आहे. याशिवाय अधून-मधून खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दौऱ्यावर जावून तपासणी करणार आहेत. यामध्ये कसूर केल्यास थेट कारवाईचे हत्यावर उपसले जाणार आहे.