शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ...

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असून, विहिरीतील दूषित पाणी काढून गावकऱ्यांना भरावे लागत आहे. गावाला शुद्ध पाणी का मिळत नाही, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका तरुणाने विहिरीत खाट लटकावून त्यावर उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाची मात्र, तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती.

गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या कार्यालयाबाहेर आणून पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून मंगेश साबळेविरुद्ध कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा साबळे याने ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी (दि.२४) सकाळपासून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्या विहिरीतून गावाला पाणी मिळते त्याच विहिरीत खाट लटकून शुद्ध पाणी द्या, अशी मागणी केली आहे.

गेवराई पायगा गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, विहिरीतून महिला, वृद्धांना शेंदून (काढून) पाणी भरावे लागते. या विहिरीच्या पाण्यामुळे चहा खराब होतो. बालकांना घसादुखीचा त्रास होतो. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न मंगेश साबळे याने केला आहे. याबाबत सरपंच पती दिलीप जैस्वाल व ग्रामसेवकांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतमधील जबाबदार व्यक्तींनीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

----

गेवराई पायगा येथील तरुण मंगेश साबळे याने गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे म्हणून विहिरीतच उपोषण सुरू केले ही माहिती मिळाली. तेव्हा मी विस्तार अधिकारी यांना तत्काळ गेवराईत पाठविले आहे. त्यांचा अहवाल येताच योग्य ते सांगता येईल, असे फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके व गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर गावविकासापासून कोसोे दूर

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरदेखील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावात पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही, ही मोठी शर्मेची बाब ठरू शकते. गावात अजूनही नळ योजनेचे जाळे विणले गेले नाही. त्याचबरोबर रस्त्यांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे गावातील समस्या सुटतील का, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील का, असे प्रश्न गावकऱ्यांतून केले जात आहेत.