शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ...

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असून, विहिरीतील दूषित पाणी काढून गावकऱ्यांना भरावे लागत आहे. गावाला शुद्ध पाणी का मिळत नाही, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका तरुणाने विहिरीत खाट लटकावून त्यावर उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाची मात्र, तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती.

गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या कार्यालयाबाहेर आणून पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून मंगेश साबळेविरुद्ध कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा साबळे याने ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी (दि.२४) सकाळपासून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्या विहिरीतून गावाला पाणी मिळते त्याच विहिरीत खाट लटकून शुद्ध पाणी द्या, अशी मागणी केली आहे.

गेवराई पायगा गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, विहिरीतून महिला, वृद्धांना शेंदून (काढून) पाणी भरावे लागते. या विहिरीच्या पाण्यामुळे चहा खराब होतो. बालकांना घसादुखीचा त्रास होतो. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न मंगेश साबळे याने केला आहे. याबाबत सरपंच पती दिलीप जैस्वाल व ग्रामसेवकांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतमधील जबाबदार व्यक्तींनीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

----

गेवराई पायगा येथील तरुण मंगेश साबळे याने गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे म्हणून विहिरीतच उपोषण सुरू केले ही माहिती मिळाली. तेव्हा मी विस्तार अधिकारी यांना तत्काळ गेवराईत पाठविले आहे. त्यांचा अहवाल येताच योग्य ते सांगता येईल, असे फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके व गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर गावविकासापासून कोसोे दूर

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरदेखील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावात पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही, ही मोठी शर्मेची बाब ठरू शकते. गावात अजूनही नळ योजनेचे जाळे विणले गेले नाही. त्याचबरोबर रस्त्यांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे गावातील समस्या सुटतील का, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील का, असे प्रश्न गावकऱ्यांतून केले जात आहेत.