शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

स्वच्छ पाण्यासाठी ‘त्याने’ विहिरीतच खाट लटकावून सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ...

बोरगाव अर्ज : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत असून, विहिरीतील दूषित पाणी काढून गावकऱ्यांना भरावे लागत आहे. गावाला शुद्ध पाणी का मिळत नाही, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका तरुणाने विहिरीत खाट लटकावून त्यावर उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनाची मात्र, तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती.

गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्या कार्यालयाबाहेर आणून पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून मंगेश साबळेविरुद्ध कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा साबळे याने ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी (दि.२४) सकाळपासून अनोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ज्या विहिरीतून गावाला पाणी मिळते त्याच विहिरीत खाट लटकून शुद्ध पाणी द्या, अशी मागणी केली आहे.

गेवराई पायगा गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही, विहिरीतून महिला, वृद्धांना शेंदून (काढून) पाणी भरावे लागते. या विहिरीच्या पाण्यामुळे चहा खराब होतो. बालकांना घसादुखीचा त्रास होतो. याकडे ग्रामपंचायत गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न मंगेश साबळे याने केला आहे. याबाबत सरपंच पती दिलीप जैस्वाल व ग्रामसेवकांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतमधील जबाबदार व्यक्तींनीदेखील या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

----

गेवराई पायगा येथील तरुण मंगेश साबळे याने गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे म्हणून विहिरीतच उपोषण सुरू केले ही माहिती मिळाली. तेव्हा मी विस्तार अधिकारी यांना तत्काळ गेवराईत पाठविले आहे. त्यांचा अहवाल येताच योग्य ते सांगता येईल, असे फुलंब्री पंचायत समितीच्या सभापती सविता फुके व गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर गावविकासापासून कोसोे दूर

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरदेखील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावात पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही, ही मोठी शर्मेची बाब ठरू शकते. गावात अजूनही नळ योजनेचे जाळे विणले गेले नाही. त्याचबरोबर रस्त्यांचीदेखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे गावातील समस्या सुटतील का, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील का, असे प्रश्न गावकऱ्यांतून केले जात आहेत.